स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य; विरोधातील याचिका फेटाळली

Date:

मुंबई-

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेत बहु सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका व्हाव्यात यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा निर्णय मागे पडला. मात्र, पुन्हा एकदा काही बदलांसह महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेनुसार निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले होते.


पुण्यातील परिवर्तन सामाजिक संस्थेसह अन्य दोघांनी जनहित याचिकेद्वारे राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर आणि पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारास बाधा येते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे या बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती देण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्यानुसार आगामी दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगास लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीवर परिणाम

महानगरपालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा हा निर्णय आहे. त्यानुसार आता आगामी निवडणुका होतील. त्यामुळे आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर तसेच चंद्रपूर महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...