नाशिक : तब्बल आठशे वर्षांपासून आपल्याकडे मराठीत महिला साहित्यिक आहेत, तेव्हा विदेशात कोणी कविता लिहीत नव्हतं आपण यावर आभिमान बाळगला पाहिजे असे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभचे प्रमुख पाहुणे गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.आपल्याकडे मुक्ताबाईनी मराठीत आठशे वर्षांपुर्वी लिखाण केलं आणि हे जगात कुठेच झालं नाही, 200 वर्षांपूर्वी विदेशात महिला पुरुषांच्या नावाने लेख, कविता लिहायच्या.मात्र मराठीत पहिली लेखीका आणि पहिली महीला डॉक्टर झाली. मिराबाईंनी 400 वर्षापुर्वी लिखाण केलं पण हिंदीच्या आधी मराठी लिखाण एका महिलेने मराठीत केलं असे जावेद अख्तर म्हणाले.
त्यांनी सांगीतलं की, मला काही मित्र मराठी पहिल्यांदा मराठी नाटक पाहायला घेऊन गेले तेव्हा मला कुणीतरी जोरदार चापट मारल्यासारखं वाटलं, ते नाटक होतं विजय तेंडुलकर यांचं शांतता कोर्ट चालू आहे, मला या महान लेखकाबद्दल काही माहिती नव्हतं याची मला लाज देखील वाटली.
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, मराठीतील महान कवी तोच आहे जो जनतेशी संवाद साधतो, त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव हेच मराठीचे सर्वांत मोठे साहित्यिक आहेत आणि आपण त्यांच्यावर आभिनान बाळगला पाहिजे असे अख्तर म्हणाले. मराठी संतानी त्यांचं साहित्य सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत साहित्य लिहिलं. त्यांनी आपलं तत्त्वज्ञान झाडलं नाही तर लोकांशी संवाद साधला असे ते म्हणाले.पुढे जावेद अख्तर म्हणाले की, भाषेच्या बाहेर देखील एक जग आहे, त्यामुळे भाषा ही एकमेकांना जोडणारा दुवा असली पाहिजे मात्र अनेक वेळा आज या भाषेमुळेच एकमेकांमध्ये दुरावा येतो, असे व्हायला नको असे ते म्हणाले.

मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले यावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो बात कहते डरते है सब तु वो बात लिखजो बात कहते डरते है सब तु वो बात लिखइतनी अंधेरी न थी रात पहले लिख- असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.

मराठी साहित्य संमेलनात होणारे वाद टाळून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

