पुणे परिमंडलातील ग्रामीण भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर

Date:

  • चक्रीवादळामुळे अंधारलेल्या 98 टक्के ग्राहकांकडे 24 तासांत वीज सुरु.

पुणे-  ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलात प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी यंत्रणा जमीनदोस्त झाली. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत 12 तासांमध्ये काल रात्रीपर्यंत तब्बल 1 लाख 27 ग्राहकांचा तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी 6350 ग्राहकांचा अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याची कामगिरी केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत अतिदुर्गम व डोंगराळ भागातील सुमारे 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु होती.

 या चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वादळ व मुसळधार पाऊस झाला. वीजयंत्रणेवर झाडे व मोठ्या फांद्या पडल्याने काही मोजक्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अवघ्या दीड तासांच्या कालावधीमध्ये तेथील वीजपुरवठा दुरुस्ती कामे व पर्यायी व्यवस्थेमधून सुरु करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी अभियंते व कर्मचाऱ्यांनी चोखपणे बजावली.

ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागातील वीजयंत्रणेला मात्र या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. पुणे परिमंडल अंतर्गत लोणावळा, खंडाळा, पानशेत, कामशेत, वेल्हा, मुळशी, जुन्नर, आंबेगाव आदी परिसरातील डोंगराळ व दुर्गम भागातील वीजयंत्रणा वादळामुळे कोलमडली. यामुळे 245 गावांमधील 1 लाख 36 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र सोमवारी (दि. 17) रात्री उशिरापर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुरुस्ती कामे करीत तब्बल 1 लाख 27 हजार आणि मंगळवारी (दि. 18) दुपारी 12 वाजेपर्यंत 6350 अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अंधारलेल्या 245 पैकी 215 गावे, वाड्या व वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सद्यस्थितीत लोणावळा, आंदरमावळ, पानशेत, माले, खानापूर व आंबेगाव परिसरातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील 30 गावे, वाड्या, वस्त्या व पाड्यांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी शहरासह ग्रामीण भागातील मोठे व कोविड रुग्णालयांसह ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा चक्रीवादळाच्या कालावधीत सुरळीत राहील याची महावितरणकडून विशेष काळजी घेण्यात आली व सुरळीत ठेवण्यात आला. चक्रीवादळाचे वेगवान वारे गेल्या 48 तासांपासून पुणे परिमंडलामध्ये घोंघावत होते. मात्र ‘हाय अलर्ट’वर असलेल्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पूर्वतयारीने व युद्धपातळीवरील सज्जतेमुळे वीजपुरवठ्यावर प्रामुख्याने संपूर्ण शहरी व बहुतांश ग्रामीण भागात फारसा परिणाम झाला नाही.

सद्यस्थितीत ग्रामीण भागातील सर्व मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र दुर्गम व डोंगराळ भागात लघुदाबाच्या वाहिन्या व रोहित्रांच्या स्ट्रक्चरवर झाडे व फांद्या पडलेल्या आहेत. त्या हटवून लघुदाब यंत्रणेची दुरुस्ती वेगाने सुरू आहे व उर्वरित 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...