महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासोबतच वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध

Date:

प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचा कर्मचारी संघटनांशी संवाद

पुणे-: कोरोना कालावधीमधील वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आर्थिक संकट गडद झाले आहे. अशा स्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. वीजग्राहकांना तत्परतेची व आपुलकीची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेच. सोबतच येत्या मार्चपर्यंत वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी ग्राहकसंवादाचे सर्वतोपरी प्रयत्न करीत राहू असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी कर्मचारी संघटनांच्या संवाद कार्यक्रमात केले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे 60 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी श्री. नाळे यांनी मंगळवारी (दि. 5) नववर्षानिमित्त व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे थेट संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 2020 वर्षाचा मागोवा घेत कोरोना संकट, ‘निसर्ग’ चक्रीवादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचे श्री. नाळे यांनी विशेष कौतुक केले.

पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे म्हणाले, की वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभुतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकत्रितपणे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या मार्च 2021 पर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीजग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर रहा. यासोबतच महावितरणच्या महसुलाकडे बारकाईने लक्ष ठेवा. मीटर रिडींगमध्ये एजंसीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करा. महावितरणच्या विविध कामांवर लक्ष ठेवा. काही चुकीचे आढळल्यास त्याची माहिती संबंधितांना देण्यात यावी. वीजक्षेत्रामधील खासगीकरणाशी संबंधीत संभाव्य बदल हे आव्हानात्मक आहे. मात्र महावितरण ही सरकारी पर्यायाने जनतेच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे महावितरणला सध्याच्या  जग्राहकांशी थेट संवाद साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील संवाद साधावा. वीजक्षेत्रातील संभाव्य विपरित परिस्थिती आणि महावितरणचे अस्तित्व टिकविण्याची गरज आदींची त्यांना माहिती देण्यात यावी. आपले वीजग्राहक चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करून निश्चितपणे सहकार्य करतील असा विश्वास प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी व्यक्त केला.

या संवाद कार्यक्रमात यावेळी उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे), श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व श्री. भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स, इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत श्रमिक कॉग्रेस इंटक, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी, वीज कामगार कॉग्रेस इंटक, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, अधिकारी संघटना, वीज तांत्रिक कामगार संघटना, बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम, कार्यालयीन कर्मचारी संघटना, वर्कर्स युनियन, राष्ट्रवादी वीज कामगार कॉग्रेस, भारतीय कामगार सेना, नवनिर्माण वीज कर्मचारी जनाधिकार सेना, लाईन स्टाफ असोशिएशन आदी संघटनांचे प्रादेशिक, परिमंडल व मंडलस्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.