भाजपने राष्ट्रपतीभवन आणि राजभवनात काळाबाजार केला, संजय राऊत यांची टीका

Date:

मुंबई – शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने अजित पवार यांच्याशी युती करत सरकार स्थापन केले. सकाळी आठ वाजता राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच भाजपने राजकीय डावपेच टाकत महाविकास आघाडीवर मात केली. दरम्यान रविवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवू दिले. भाजपने महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला. घोडेबाजार करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला, भाजपनं सचोटीन व्यापार करायला हवा होता. असा घणाघात राऊत यांनी यावेळी केला. भाजपकडे बहुमत होते तर चोरून शपथविधी का केला? भाजपने राष्ट्रपतीभवन आणि राजभवनात काळाबाजार केला आहे. अशी टीका केली आहे.

दरम्यान तीन पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचे बहुमत आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर अजित पवार यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...