खासदार बापटांनी उडविली खिल्ली ..म्हणाले राष्ट्रवादीची तर एकाच घरातील चौघांची पार्टी-ते हि तत्वाला न बांधलेले, आपसात वाद असलेले…

Date:

पुणे-गजानन मारणे यांची पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी मनसे मधून राष्ट्रवादी मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रवेश केला.राष्ट्रवादीने एसीबी कडे पुणे महापालिकेच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी केली आहे, आणि दुसरीकडे १६ भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असे म्हटले आहे. त्यावरून भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि,’ राष्ट्रवादी पार्टी ही केवळ पाश्चिम महाराष्ट्रापुरती आहे. ती काही देश पातळीवरच पार्टी नाही. त्यांचामध्ये परिवारवाद असून त्यांच्या परीवाराचेच दोन चार जण निर्णय घेतात. ते देखील कुठल्याही तत्त्वाला बांधिल नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची आज खासदार बापटांनी खिल्ली उडविली.

मोदी अजिबात कोणाचीच माफी मागणार नाहीत.

पुणे महापालिकेत १५ दिवसांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. त्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात प्रत्येक राजकीय कार्यक्रम आणि आंदोलनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे.आज भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी गिरीश बापट यांच्या घराबाहेर देखील भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर भाजपाचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, ”कधीही कोणत्याही राजकीय पार्टीला आंदोलनाबाबत विरोध करीत नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. माझ्या घराबाहेर देखील आमचे कार्यकर्ते जमले होते. काही करायचे नाही, असे त्यांना मी सांगितले होते. तसेच त्या आंदोलनामध्ये २० ते २५ पण कार्यकर्ते नव्हते. जर दुर्दैवाने काही गडबड झाली असती. तर आम्ही जशाच तसे उत्तर दिले असते.”तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, मोदी अजिबात कोणाचीच माफी मागणार नाहीत. ”मोदींनी मुंबईच जे उदाहरण दिले आहे. ते खरं असून ज्या पद्धतीने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली. त्या सर्व कामगारांची काळजी अगोदरच केंद्र सरकारने घेतली होती. करोना काळात केंद्र सरकारला सहकार्य न केल्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागावी.”,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

महापालिका निवडणुकीत आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ –

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे किती नगरसेवक निवडून येतील? या प्रश्नावर गिरीश बापट म्हणाले की, महापालिकेच चित्र स्पष्ट असून तीन प्रभाग पद्धत आमच्या दृष्टीने चांगले झाले आहे. आमच्या नगरसेवकांनी करोना काळ आणि त्यानंतर देखील चांगले काम केले आहे. पण महापालिकेच्या चांगल्या कामांना अडथळा आणण्याचे काम शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. त्याचा जाब आम्ही निवडणुकीदरम्यान निश्चित विचारू आणि आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने काल लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.त्यावर ते म्हणाले की, आमची तक्रार कुठे ही करा, दूध का दूध पाणी का पाणी..अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...