मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारे

Date:

पुणे-लोकपालच्या आंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदी सरकावर थेट तोफ डागली आहे. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरुन बोलत होते. मात्र आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असे असं अण्णा हजारे म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धीत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र आज पाच वर्ष होऊनही त्यांना अद्याप लोकपाल नेमता आलेला नाही. ही देशाशी गद्दारी आहे, अशा तिखट शब्दांमध्ये अण्णा मोदी सरकारवर बरसले. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसची डॉक्टरेट, तर भाजपा ग्रॅज्युएट असल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राज्य सरकार साफ खोटं बोलत आहे, माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही. केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटायला येणार असं मला कळवण्यात आलं. मी त्यांना कळवलं की तुम्ही येऊ नका कारण तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, मागण्या किती मान्य केल्या ते लेखी द्या त्यानंतर आम्ही विचार करू तुमच्यावर आता आमचा विश्वास नाही असंही अण्णांनी म्हटलं आहे.

उपोषण करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलेली गोष्ट ऐकणार का? त्यावर अण्णा यांनी नाही म्हटलं आहे. परमेश्वर माझ्या पाठिशी आहे. मी आणखी पाच दिवस तरी उपोषण करू शकतो आणि मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण करणारच असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी भेट घेतली, माझ्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली त्याचं बरं वाटलं मात्र मी माझं उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नाही. लोकपाल, लोकायुक्तांच्या मागणीमुळे जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यावर आता मात्र लोकपाल आणि लोकायुक्त यांचा सोयीस्कर विसर मोदी सरकारला पडला. मोदी देश हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत असाही आरोप अण्णा हजारेंनी केला. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत असाही आरोप पत्रकारांशी बोलताना केला.

2013 मध्ये भाजपाने तुमचा वापर केला असं राज ठाकरे म्हटले, त्याबद्दल काय सांगाल? असं विचारताच अण्णा म्हटले की राज ठाकरे म्हटले ते सत्य आहे सगळ्या देशालाच हे माहित आहे. त्यावेळी लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपाची सत्ता आली मात्र आत्ता त्यांना माझा आणि आंदोलनाचा विसर पडला. भाजपा असो आप असो कोणीही लोकपाल, लोकायुक्त यांच्यावर शब्दही काढत नाहीत हे दुर्दैवी आहे असंही अण्णा हजारे म्हटले आहे. तसंच सत्ता बदलून परिवर्तन होणार नाही व्यवस्था बदलली पाहिजे असंही मत यावेळी अण्णा हजारेंनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत असं वाटलं होतं मात्र त्यांनी वारंवार शब्द देऊनही तो पाळला नाही त्यामुळे आता त्यांच्यावर माझा विश्वास राहिला नाही असंही अण्णा म्हटले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...