पाठांतर चिंतन-मनन आणि मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या – डॉ.गजानन एकबोटे

Date:

पुणेप्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल येथे दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव, संस्थेचे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, संस्थेच्या सहकार्यवाह,नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे,समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे,नियामक मंडळ सदस्य डॉ.नंदकिशोर एकबोटे, उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष व उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, शाळेचे व्हिजिटर उद्धव खरे, नियामक मंडळ सदस्य मृगजा कुलकर्णी,मुख्याध्यापिका सांगिता लकारे,उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे,पर्यवेक्षिका सीमा कुळधरण,माजी पर्यवेक्षक पी.के.जोशी  उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व संस्कृत गीत सादर करून केले. मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी प्रस्ताविक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी घेवडे यांनी करून दिला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव म्हणाले,संस्कृत मंत्राच्या उच्चरणामुळे स्मरणशक्ती वाढते,बुद्धी तल्लख होते.वाणी शुद्ध व स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची आवड निर्माण केली पाहिजे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले,संस्कृत ही अतीप्राचीन भाषा आहे.तसेच वेदांची जननी आहे,देव वाणी आहे,ज्ञानाचा महासागर असलेली संस्कृत भाषा खूप सुंदर असून संस्कृत पाठांतर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थी मित्रांनो पाठांतर शिवाय पर्याय नाही.पाठांतरावर माणूस जीवनात मोठा होतो पाठांतर चिंतन-मनन वाचलेलं जन्मभर विद्यार्थ्यांना त्याची शिदोरी म्हणून पुरत असते.पूर्वी पाठांतराला भरपूर महत्त्व होते.मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थी परिपूर्ण घडतो आणि जीवनात यशस्वी होतो.आज मला आमच्या शिक्षकांची आठवण होते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांची आठवण येईल असे शिक्षण दिले पाहिजे.अनेक शिक्षणतज्ञ म्हणतात पाठांतर नको पण पाठांतर शिवाय शिक्षणाला महत्त्व नाही.संस्कृत भाषेचे व पाठांतराचे महत्त्व ओळखून आपल्या संस्थेने संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते.सातशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेतील तीनही परितोषिके महापुरुषांच्या नावाने देण्यात येतात.पहिले बक्षीस – संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले पुरस्कार- रूचा गोरीवले, आशा भालेकर, भक्ती रेणुसे, अनन्या गोवंडे, सानिया भंडारे, अनुश्री पोळेकर दुसरे बक्षीस – संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार- श्रेया जिरगे, सौम्या कुलकर्णी,सिद्धांत पटवे,नील पत्की,संदेश सरवदे,साक्षी मेहेंदळे तिसरे बक्षीस – लेखक छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार – प्रांजल महाडिक,निशा बन,मधुरा शेळके,आर्या गरगटे,आकांक्षा वाडेकर, ईशान ठाकूर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी घेवडे,सतीश लिंबेकर, सुमिता पाटील,ईशानी ढेरे,खंडू खेडकर,अमित ओमासे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...