पुणे- महागाई च्या विरोधात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज अलका चौकात निदर्शने करण्यात आली
यावेळी अजय शिंदे म्हणाले कि, जीवनावश्यक वस्तू सरासरी 30 ते 50 % नी महाग झाली आहे तर भाजीपाला आणि कांदा 100 % नी महाग झाला आहे कोणतीही भाजी 120 रु किलो कांदा 80 ते 100 रु इतका महाग झाला आहे तेल सरासरी 30 ते 40 रु ने तर डाळी आणि कडधान्ये सुद्धा अशाच पद्धतीने महाग झाले आहे चहा पावडर सरासरी 50 ते 60 रु ने किलो मागे महाग झाली आहे सरकार हो जनतेने जगायचं कसं ? हा प्रश्न आहे
प्रचंड महागाई वाढत असताना राज्य सरकार महागाई कमी करण्यासाठी कोणत्याच पातळीवर सरकार काम करत नाही. सरकार मधील प्रमुख मंडळी हा केंद्राचा विषय हा समित्यांचा विषय असे म्हणून टोलवा टोलवी करत आहेत काही मंत्री तर परवडत नसेल तर खाऊ नका असे सल्ले देत आहेत .अस काम करणारया सरकारला जाग करण्यासाठी आणि महागाई कमी करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलने रस्त्या रस्त्या वर करू हा इशारा सरकारला देण्यासाठी मनसेने आज निदर्शन केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने पदाधिकारी उपस्थित होते निदर्शनाची दखल न घेतल्यास सरकार ला सळो की पळो करण्याचा इशारा याठिकाणी देण्यात आला .
यावेळी पुणे शहर अध्यक्ष अजयभाऊ शिंदे, उपशहर अध्यक्ष हेमंत बत्ते, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, विभाग अध्यक्ष सुनिल कदम, सुधीर धावडे, प्रशांत मते, आशिष देवधर, वाहतूक पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी, विभाग सचिव रमेश जाधव, आकाश धोत्रे, अभिषेक थिटे प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, महेश शिर्के, लक्ष्मण काते , कुलदीप घोडके, योगेश महिंद्रकर , बाळासाहेब शिंगाडे, शाम ताठे, सचिन काटकर, प्रवीण मिसाळ, उदय गडकरी, अभिषेक येनपुरे, जेमा चव्हाण, विनोद गायकवाड, राहुल कदम, पिंटू रसाळ, आदी पदाधिकारी उपस्थिती होते..

