Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रॅपीडो विरोधातली लढाई जिंकलो ; रखडलेल्या मागण्यांसाठी संघर्ष करू : बाबा कांबळे

Date:

बोगस संघटना कडून रिक्षा आंदोलनाचे विद्रोपीकरण रिक्षा विश्वाची हानी करण्याचे प्रयत्न

पुणे –

लोकशाही मार्गाने लढा दिल्यास यश निश्चित मिळते. देशात अद्यापही कायदा सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे. रॅपिडो कंपनी विरोधात रिक्षा चालकांनी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला त्याला यश देखील मिळाले. मात्र आता आणखीन जबाबदारी वाढली असून उर्वरित रखडलेल्या मागण्या देखील सनदशीर मार्गाने आंदोलन करून सोडविण्यासाठी संघर्ष करू, असा विश्वास महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

रॅपिडो कंपनी विरोधात न्यायालयीन लढ्यात यश मिळाल्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुन्हा रिक्षा फेडरेशन व इतर रिक्ष सहकारी संघटनांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबा कांबळे बोलत होते.या पत्रकार परिषदेत ऑटो टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कृती समिती व महाराष्ट्राच्या पंचायत प्रदेश अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे,आदी उपस्थित होते.

आज रिक्षा चालक मालकांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर कायदेशीर सल्लागार शारदा वाडेकर, सह्या परिवहन अधिकारी आनंद भोसले यांचा सत्कार करण्यात आला,

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांच्या लढाईमध्ये रॅपिडो कंपनीच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात दिलेला लढा हा एका टप्प्याचा भाग आहे. रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे, बोगस रिक्षा संघटना विरोधात कारवाई करणे आदीसह अनेक रिक्षा चालकांच्या कल्याण करणाऱ्या मागण्या आहेत. त्यासाठी देखील कायदेशीर मार्गाने लोकशाहीवर विश्वास ठेवून संघर्ष करणार आहे. चुकीच्या मार्गाला न जाता कायदेशीर मार्गाने संघर्ष करू अशी भूमिका वारंवार महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने घेण्यात आली. मात्र काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम केले होते. मात्र आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने देखील सोडविता येतात, ही भूमिका आम्ही घेतली. रॅपिडोच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीविरोधात न्यायालयात दाद मागितली. रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयाची देखील लढाई आम्ही जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय असून लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले आहे.

रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आव्हान देणारी इंटरवेशन याचिका महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर मित्र संघटनांनी केली. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. न्यायालयातील लढाई जिंकण्याचे आव्हान होते. मात्र रिक्षा चालकांची वकिलांमार्फत योग्य भूमिका लावून धरली. अडचणी सांगितल्या. त्यामुळे न्यायालयाने देखील रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपिडोवर बंदी घातली. ही लढाई ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालक मालकांच्या आयुष्यात मोठा बदल आला असून या निर्णयाचा फायदा देशभरातील 15 कोटी रिक्षा, टॅक्‍सी, बस टू व्हीलर यांना होणार आहे. तर महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक-मालकांना याचा फायदा होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

आनंद तांबे म्हणाले सार्वजनिक वाहतूक व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रिक्षा व टॅक्‍सी सेवा या कायदेशीर आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नोंदी नाहीत, परमीट नाही, परवाना नाही. मग प्रवासी वाहतूकीला परवानगी कोणी दिली असे न्यायालयाने संबंधीतांना फटकारले, असे आनंद तांबे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...