उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन.

Date:

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा.

मुंबई, दि. २८ डिसेंबर..
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.

उन्नाव प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने सांताक्रूज ते चर्चगेट दरम्यान लोकलने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष शिव जतन यादव, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धावळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी थेट संवाद साधला व उन्नाव बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणात सरकारची भूमिका किती लाजिरवाणी आहे हे जनतेसमोर मांडले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भाजपच्या पोकळ घोषणा आहेत. भाजपचा खरा चेहरा उन्नाव प्रकरणाने उघड झाला असून भाजप सत्तेच्या जोरावर सेंगरसारख्या बलात्कार्‍यांना वाचवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खरोखरच संवेदनशील, संविधानिक आणि न्यायप्रिय भूमिका घेणे गरजेचे असताना भाजप सत्तेचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देत आहे. या प्रकरणात आरोपीला दिलासा देणाऱ्या सर्व निर्णयांचा निषेध करत, पीडितेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जनजागृती मोहिमेदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. महिलांच्या सुरक्षेच्या नावाने केवळ जाहिरातबाजी करणारा भाजप प्रत्यक्षात आरोपींच्या बाजूने उभा राहतो, हा विरोधाभास जनतेपर्यंत पोहोचवणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे झीनत शबरीन म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिडकरांचा नागरिक भेटींचा धडाका, जनसंपर्क अभियानातून ६० हजारांहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद

पुणे: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे दोन दिवस...

अनुयायी व बुकस्टॉल धारकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-ॲड गोरक्ष लोखंडे

विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याचे केले आवाहन पुणे,...

काँग्रेस पक्षाचा १४० वा वर्धापन दिन साजरा.

पुणे -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १४० वा वर्धापन दिन...

९९ विद्यार्थी सादर करणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘खरा तो एकची धर्म…’

९९व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शहरी-ग्रामीण विद्यार्थी घडविणार इतिहास पुणे : महाराष्ट्राची संस्कृती आणि शूरवीरांच्या पराक्रमाची महती सांगणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि मानवता, समता तसेच सेवाभाव आणि प्रेमाचा संदेश देणारी साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात  ९९ विद्यार्थी सामूहिकरित्या सादर करून इतिहास घडविणार आहेत.  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे होत आहे. शतकपूर्व संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे यासाठी संयोजक पराकाष्ठा करीत असून संमेलनाच्या शुभारंभ प्रसंगी संमेलन गीताबरोबरच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सादर होणार आहे. संमेलनाच्या मुख्य संयोजन समितीच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद  जोशी व कोषाध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून ही अभिनव कल्पना राबविण्यात येत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी विनोद कुलकर्णी व संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे  प्रमुख राजेश जोशी असून समन्वयक ज्येष्ठ रंगकर्मी सुजीत शेख आहेत. या अभिनव उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील २५ शाळांमधून आठवी ते बारावीतील ९९ विद्यार्थ्यांची निवड संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेची नव्या चालीत संगीततज्ज्ञ राजेंद्र आफळे यांनी बांधणी केली असून त्यांना संगीततज्ज्ञ बाळासाहेब चव्हाण, संगीत संशोधक व अभ्यासक डॉ. स्वरदा राजोपाध्ये, जेष्ठ संगीत शिक्षिका वर्षा जोशी, ज्येष्ठ शाहीर भानुदास गायकवाड यांच्यासह संमेलनगीताचे गीतकार राजीव मुळ्ये तसेच सचिन राजोपाध्ये, मिलिंद देवरे, सचिन शेवडे यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमात छत्रपती शाहू अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, शारदाबाई पवार आश्रम शाळा, यशोदा शिक्षण संस्था, पोदार इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांचा समावेश आहे. स्वतंत्र संगीत शिक्षकांची उपलब्धता नसतानाही ग्रामीण भागातील शाळांचा उत्साहपूर्ण सहभाग आहे. शहरी भागातील शाळांमधील संगीत शिक्षकांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.