पुणे- मनसे आणि शिवसेना युती झाली,दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि भाजपच्या सामन्यासाठी बाह्या सरसावल्या पण हि लढाई लढताना महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवार गटाने या युती बरोबर राहण्याचा मुंबईत निर्णय देखील जाहीर केला.कॉंग्रेसने भाजपा ला विरोध म्हणून ठाकरे बंधूंचे स्वागत केले असले तरी त्यांनी मविआ मध्ये त्यांच्या सोबत नसल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीचा पोपट तर गायबच झाला. मग पुण्यात कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी श.प यांची बैठक कशी झाली ? हा प्रश्न उपस्थित करत कार्यकर्ते कनफ्युज…झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मनसे चे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि,’ मनसे शिवसेनेची युती महाराष्ट्रा साठी झाली आहे.यात मुंबईत काँग्रेसचा समावेश नाही राष्ट्रवादी (शरद पवार) हा पक्ष मुंबईत किंवा पुण्यात बरोबर येण्या साठी सकारात्मक आहे.त्याची बोलणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सुरू आहे मात्र अशी परिस्थिती काँग्रेस सोबत नाही असे असताना पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीत जावे का प्रश्न मनसे समोर आहे. हा प्रश्न असल्या मुळे काल झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाली नाही.मुळात एका शहरात विरोधात लढणाऱ्या पक्षाशी दुसऱ्या शहरात आघाडी करणे जनतेच्या पचनी पडेल का याचा विचार शिवसेनेने केला पाहिजे “आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल” तर ते योग्य होईल. याबाबत आम्ही आज दुपारी चर्चा करून माध्यमांना योग्य ती माहिती पुरवू असेही ते म्हणाले.
दरम्यान कॉंग्रेसच्या एका नेत्याने असे म्हटले आहे कि,या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी श.प हा पक्षच अस्तित्वात राहणार नाही असा अनेकांचा अंदाज आहे त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य आणि तत्वावर ठाम राहिलेल्या कॉंग्रेसला आता स्वतंत्रपणे लढण्याशिवाय मार्गच उरलेला नाही.जे निवडून येतील त्या बळावर कॉंग्रेस लढतच राहील. सत्तेत यायलाच हवे असे काही या पक्षाचे नाही, विरोधात बसूनही हा पक्ष आपली ठाम भूमिका कणखर पणे मांडत राहील.

