बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

Date:

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड या तालुक्यांतमधील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. पीक पध्दती सिंचनाच्या उपलब्धततेमुळे बहुतांशी भागात ऊसशेती करण्यात येते. ऊसशेतीमुळे वन्यप्राणी बिबट्यास मुबलक भक्ष्य व पाण्याची उपलब्धतता होते, तसेच लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळतो. शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून करण्यात आलेल्या पशुपालन, कुक्कुटपालन आदी माध्यमातून भक्ष्य उपलब्ध होते.

जिल्ह्यात वन विभागाच्यावतीने मानव व बिबट यामधील संघर्ष कमी करण्याकरिता वन्यप्राणी बचाव व पुर्नभेट, नियमित गस्त, पायाभूत सुविधा व नुकसान भरपाई, सुरक्षितता व काळजी, नियमित प्रशिक्षण, व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यांची शास्त्रीय गणना करण्याच्यादृष्टीने क्षेत्रीय माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. बिबटप्रवण क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त व टेहाळणी, एआयचा वापर, रात्रगस्त करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर बिबट समस्या निराकरण समिती गठीत करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे शास्त्रीय व क्षेत्रीय ज्ञान वृद्धींगत करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन, ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन, “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” घोषीत, एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन, मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांना सौर दिवे व लंबुंचे (टेन्ट) वाटप, एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत ७५ बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण, नागरिकांना नेक गार्डचे वाटप, अनायडर्स मशीन कार्यान्वित आदी उपाययोजना करण्यात येत आहे.

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे. जुन्नर वन विभागात वाढलेला बिबट्याचा प्रादुर्भाव व बिबट-मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.

जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत १८५ बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये व शाळांमधून सुमारे ५५ कार्यक्रम करण्यात आले असून व विषय प्राविण्य असणारे श्री. सौमित्रच्या मार्फत वेगवेगळ्या ५० गावांमध्ये विभागातील योजना तसेच बिबट जनजागृतीचे विशेष वर्ग ग्रामपंचायत पद अधिकारी यांचे सह घेण्यात आले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतचे माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण ४०० सदस्य कार्यरत आहेत.

अतिसंवेदनशील गावांत २४ X ७ जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरुर), आळे व नगदवाडी, जुन्नर (ता. जुन्नर), आणि गावडेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील व आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील २ वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे.

विभागीय कार्यालय जुन्नर येथे निंयत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक १८००३०३३) स्थापन आले असून २४ X ७ कार्यरत आहे, यामाध्यमातून अतिसंवेदनशील क्षेत्राची माहिती गोळा करुन गस्तीबाबत सूचना देण्यात येते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै २०२४ मध्ये संघर्षक्षेत्रातील १० बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. ५० बिबटे वनतारा जामनगर गुजरात येथे पाठवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना ४१० सौर दिवे व ४१० लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत. शिरुर व मंचर वनपरिक्षेत्रातील एकूण ५५ ठिकाणी एआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.

वनविभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” घोषीत करण्यात आले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत १५० घरांना सौर उर्जा कुंपण बसविण्यात आले असून आणखीन ५५० घरांना कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. विभागात एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित आहेत. वनविभागामार्फत ४०० आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना ३ हजार ३०० नेक गार्डचे वाटप, ५० ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित आहेत. त्यामुळे नागरिकांहो, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करा. बिबट्यापासून सावध राहा, खबरदारी घ्यावी. आपण व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या.

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे,

काय काळजी घ्याल ?:
बिबट्याचा पाठलाग करु नका. त्याला जखमी करु नका. बिबट्या घाबरुन उलटा हल्ला करु शकतो. मुलांनी घोळक्याने फिरावे. अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला किंवा बरोबर रेडिओवर गाणी लावून बॅटरी घेऊन फिरावे. रात्री उघड्यावर झोपू नये. विशेषतः मेंढपाळांनी झोपण्यासाठी बंदिस्त जागा करुनच झोपावे. सायंकाळी व रात्री अनावधाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समुहाने वावरावे. मुलांना एकटे सोडू नका. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करावी. गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांना बळी पडू नका.

अचानक बिबट्या समोर दिसल्यास काय कराल ?: अजिबात घाबरू नका. शांत उभे रहा.पळून जाऊ नका. तुम्ही कितीही वेगाने पळालात तरी बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकत नाही. पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळे तो हल्ला करू शकतो. तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा. असे केल्याने, बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो.

जर बिबट्या जवळ असेल, तर ओरडतच हळूहळू मागे सरका. जर तो दूर असेल, तर शांतपणे हात वर करून मागे हटा. झाडात किंवा झाडीत लपू नका. लपण्याचा प्रयत्न केल्यास, बिबट्या तुम्हाला एखादा लहान प्राणी समजून हल्ला करण्याची शक्यता वाढते. खाली वाकू नकाः वाकल्यास तुम्ही लहान दिसता, ज्यामुळे हल्ला होऊ शकतो.

श्री. प्रशांत खाडे, उपवनंरक्षक, जुन्नर वन विभाग: ‘जुन्नर उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने मानव व बिबट यामधील संघर्ष कमी करण्यासोबतच जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना व जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमितपणे वापर करावा. सकाळ आणि रात्रीच्या वेळेत शेतात जाण्याचे टाळावे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन वनविभागास सहकार्य करावे. बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास कार्यालयाच्या निंयत्रण कक्षाच्या १८००३०३३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...