अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

Date:

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते ‘अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक ‘ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अटलजींनी ग्रामीण भारतातील नागरिकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी योजनांचा लाभ देऊन, त्यांच्या जीवनात उन्नती आणण्याचे काम केले. या योजनांची पायाभरणी अटलजींनी करीत, विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. या योजनांना पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनेफिट्स म्हणता येईल. या स्वप्नाला नरेंद्र मोदीजी पुढे नेत २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना मांडली असून, त्यादृष्टीने आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सवात मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले आणि मेधा किरीट लिखित ‘अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, माजी खासदार किरीट सोमय्या, राजहंस प्रकाशनाचे शिरीष सहस्रबुद्धे, मेधा किरीट, दिलीप महाजन, डॉ. सुनील भंडगे, डॉ. श्रीपाद ढेकणे आदी उपस्थित होते. आटपाडी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात आटपाडी परिसरातील एक लाख पुस्तकांचे वाचन ग्रामस्थांनी केले आहे.

तावडे म्हणाले, देशातील सुमारे ४० टक्के जनता घराच्या बाहेर पडत नाही, हे वास्तव आहे. या नागरिकांच्या विकासासाठी काम करावे लागणार असून, जबाबदारी घ्यावी लागेल. देशाच्या ग्रामविकासाची संकल्पना माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडली होती. पंतप्रधान रस्ते योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेचा विकास झाला आहे. नागरिकांना शाळेपर्यंत जाता येते, तर रुग्णालयाt कमी वेळेत पोहोचता येते. शेतीमालाला कमी वेळेत बाजारपेठेत नेता येते. या सर्वामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात उन्नती होत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे गरिबांना मोफत धान्य, ग्रामीण भागातील नागरिकांना किसान सन्मान योजना किंवा लाडकी बहिणसारख्या योजना, महिला बचत गटांना सहकार्य, उद्योगांसाठी आर्थिक मदत करणे, अशा ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. यातूनच २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना यशस्वी होणार आहे. याची संकल्पना अटलजींनी मांडली आणि ती यशस्वी राबविण्याचे काम नरेंद्र मोदीजी करीत आहेत, असे तावडे यांनी सांगितले. तावडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला प्रतिष्ठा मिळाली, हे यश पुणेकरांचे आहे. मराठी वाचक वाचण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना चांगले दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अटलजी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर साहित्यिक, कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध होते. अटलजींच्या सारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वावर पुस्तक लिहिणे ही मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी मेधा किरीट यांनी यशस्वीरीत्या पेलली आहे. या पुस्तकातून युवा पिढीला भरपूर ज्ञान मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी ते मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत झालेल्या भेटी आणि संवादाच्या आठवणी सांगितल्या. यावेळी संपूर्ण सभागृह अटलजींच्या आठवणीत रमले होते.

किरीट म्हणाल्या, पुस्तक दोन भागात आहे. या पुस्तकाचा पहिला भाग १९८७ मध्ये प्रकाशित झाला होता. तो ५० पानांचा होता. त्यामुळे पुढील भाग कमी पानांचा आणि तितकेच चांगले व्हायला हवा, या अपेक्षेने शिरीष सहस्रबुद्धे आणि मी काम करायला सुरुवात केली. खूप काळ गेला असला, तरी पुस्तक उत्तम झाले आहे. अटलजी आमच्यासाठी देव होते. त्यांचा सहवास आणि पाठिंबा लाभला आहे. त्यांच्या आठवणी आम्ही मौल्यवान वस्तूप्रमाणे जपून ठेवल्या आहेत. अटलजींनी आमच्यासारख्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत.अशा आठवणी या पुस्तकातून वाचायला मिळेल. त्यामुळे पुस्तक वाचून झाल्यावर, प्रतिक्रिया कळवा, असे आवाहन किरीट यांनी केले.

सहस्रबुद्धे म्हणाले, अटलजींवर त्यांच्या जवळच्या व्यक्तीने पुस्तक लिहिणे ही खरचं उत्तम बाब आहे. अटलजी हे चरित्रनायक होते. त्यांच्यामुळे त्यांच्यावर पुस्तक येणे. मेधा किरीट यांनी अटलजींचा सहवास लाभला आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांग सुंदर झाले आहे. त्यात अटलजींच्या अनेक आठवणी आहे. यातील याज्ञिक हा शब्द मला भावला आहे. जन्म, बालपण, त्यांचा जीवनपट १०० पानामध्ये लिहिणे ही फार कठीण बाब आहे. मात्र, हे शक्य करून दाखविले आहे. मराठे यांनी अटलजींच्या आठवणी सांगितल्या. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती दिली.
पुस्तक महोत्सवही एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो ?

पुस्तक महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकत, हे मला वाटले नाही. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक मंत्री, खासदार यांनाही पुस्तक महोत्सवाचे आयोजन करावेसे वाटले नाही. मात्र, राजेश पांडे कोणत्याही पदावर नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तक महोत्सव आयोजित करू शकतात, हे इथे आल्यावर समजते. पुण्यातील साने गुरुजींच्या वारसदार जे जमले नाही, ते अमळनेर तालुक्यातील एक खेड्यातून समोर आलेल्या गोळवलकर गुरुजींच्या कार्यकर्त्याला जमले, असे कौतुक विनोद तावडे यांनी राजेश पांडे यांच्या कामाचे केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...