ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू

Date:

ठाणे- महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात शुक्रवारीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता एका रात्रीत या रुग्णालयात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयांमधील अनागोंदी कारभार समोर आला आहे.

अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री 17 रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे समोर येत आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने आणि काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याचे कबुल केले आहे. तसेच, या रुग्णालयात लवकरच डॉक्टरांची भरती करून रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हस्के यांनी सांगितले.

दरम्यान, ठाण्यातील सिव्हील रुग्णालय बंद असल्याने सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत आहेत. त्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी 10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. आता केवळ शनिवारी रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नव्हते, रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नव्हते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात उपचार न मिळाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

शनिवारी रात्री मृत्यूमुखी पडलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या एका पाहुण्याला डायबिटीस आणि इतर त्रास असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. नंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूत दाखल केले. मात्र, त्यांना इन्सुलिन दिले गेले नाही. आम्ही वारंवार ते देण्याची विनंती करत होतो. रुग्णाकडे नातेवाईकांनाही दिले जाऊ जात नव्हते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर गोळ्या, जेवण याकडे पूर्ण दुर्लक्ष होत होते. नातेवाईक काही म्हटले तर त्यांना बाहेर हाकलले जात होते. आयसीयूतच रुग्णांची अशी हेळसांड असेल तर जनरल वॉर्डात किती भीषण स्थिती असेल याची कल्पना आपण करू शकता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आता वेळ झाली’ – आयुष्याच्या शेवटच्या निर्णयावरचा हळवा प्रवास ६ फेब्रुवारीपासून अल्ट्रा झकासवर OTT प्रीमियर

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२६ : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस नेमकं काय निवडतो? वेदना...

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी रोजी

पुणे, दि. ४ फेब्रुवारी: फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक...

फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 09 फेब्रुवारी 2026 पासून

·         फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति...

TCS BaNCS™ तैनात-जनता सहकारी बँकेमध्ये ग्राहकांना मिळणार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे सुधारित आणि जलद डिजिटलसेवा

बँकेच्या सर्व सेवा एकत्रित करणारी एक नवीन, आधुनिक प्रणाली प्रदान करण्यासाठी टीसीएस तिच्या प्रगत आणि पुरस्कार विजेत्या बँकिंग सॉफ्टवेअरचा वापर करेल. यामुळे बँकेला नवीन सेवा जलद सुरू करता येतील, ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि तिचे संपूर्ण बँकिंग ऑपरेशन्स डिजिटल करता येतील. पुणे, मुंबई, : जनता सहकारी बँक पुणे (JSBL) ने तिच्या आधीच्या बँकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी TCS BaNCS™ या जागतिक बँकिंग प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (BSE: 532540, NSE: TCS), जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक सुधारित बँकिंग अनुभव निर्माण करेल. TCS BaNCS चे आधुनिक डिजिटल चॅनेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ऑफलाइन शाखांमध्ये अखंड सेवा प्रदान करतील. TCS BaNCS ग्लोबल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित, जनता सहकारी बँक पुणे तिच्या बँकिंग प्रणालीमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहे. यामध्ये कोअर बँकिंग, पेमेंट्स, ट्रेड फायनान्स आणि AML/KYC अनुपालनाचे आधुनिकीकरण यांचा समावेश असेल. बँकेचा उद्देश तिच्या वाढीला गती देणे, सर्व चॅनेलवर (मोबाइल, वेब आणि शाखा) उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करणे आणि बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करणे आहे. या परिवर्तनामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल, कर्जाची गुणवत्ता सुधारेल आणि जोखीमांवर चांगले नियंत्रण येईल. शिवाय, या तंत्रज्ञानामुळे बँकेला सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांचे पालन करण्यास सक्षम केले जाईल. जनता सहकारी बँक पुणेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली. पुण्यातील सहकारी संस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजोपयोगी कल्याणकारी उपक्रम म्हणून सुरू झालेली ही बँक आता भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. आपल्या देशव्यापी नेटवर्कद्वारे, बँक व्यक्ती आणि लहान व्यवसायांना बचत खाती, कर्जे आणि आधुनिक डिजिटल सेवा देते. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी, बँक स्वतःचे डिजिटलीकरण करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी सक्रियपणे काम करण्यात आघाडीवर आहे. जनता सहकारी बँक पुणेचे सीईओ श्री जगदीश पी. कश्यप म्हणाले: "जनता सहकारी बँकेत, आमच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेणे आणि त्यांना उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करणे हे राहिले आहे. आमच्या डिजिटल प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही TCS BaNCS सोबत भागीदारी करून एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. या परिवर्तनामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना जलद आणि सोप्या डिजिटल सेवा प्रदान करता येतील. ग्राहकांची सुविधा हे आमच्या प्रत्येक कामाचे प्राधान्य राहावे हे आमचे उद्दिष्ट आहे." टीसीएसच्या फायनान्शियल सोल्युशन्स विभागाचे ग्लोबल हेड श्री. वेंकटेश्वरन श्रीनिवासन म्हणाले: "जनता सहकारी बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही भारतातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक आणि सुरक्षित बँकिंग तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही या बँकेसाठी एक आधुनिक प्रणाली सादर करत आहोत जी केवळ या क्षेत्राच्या अद्वितीय गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक पातळीवरील सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा देखील समावेश करते. यामुळे ग्राहकांचा अनुभव वाढेल, नियामक अनुपालन सोपे होईल आणि बँकेला नवीन उत्पादने लाँच करण्यास आणि बाजारपेठेतील तिची स्थिती मजबूत करण्यास सक्षम केले जाईल." टीसीएसच्या सहयोगाने विकसित केलेल्या या नवीन प्रणालीमुळे  ग्राहकांना डिजिटल खाती उघडणे आणि स्वतःच्या बँकिंगचे (स्वयं-सेवा) व्यवस्थापन करणे खूप सोपे होईल. यामुळे बँकेचे कामकाज अधिक अचूक आणि जलद होईल आणि ग्राहकांना विविध आधुनिक सेवांचा फायदा होईल. स्केलेबल एपीआय-आधारित तंत्रज्ञान बँकेला बाजारपेठेतील बदलांशी त्वरित जुळवून घेण्यास सक्षम करेल, ग्राहकांना नेहमीच सर्वात आधुनिक आणि प्रगत बँकिंग वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल याची खात्री करेल. याव्यतिरिक्त, बँक तिची ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स पूर्णपणे डिजिटलाइज करण्यात सक्षम बनेल. यामुळे पैशाचे व्यवहार त्वरित होतील, जोखीम ओळखणे सोपे होईल आणि सरकारी नियमांचे चांगले पालन आणि देखरेख सुनिश्चित होईल. TCS...