अनिल अंबानींकडून राज्यातील नऊ विमानतळ ताब्यात घेणार, फडणवीस यांचा विधानसभेत दावा

Date:

 मुंबई-२००८-२००९ मध्ये राज्यातील नऊ विमानतळ तत्कालीन सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले. पण अंबानी यांनी लंडन येथील कोर्टात त्यांचे दिवाळे वाजल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याकडून हे विमानतळ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. गरज पडल्यास अंबानींच्या कंपनीकडून नंतर रक्कम वसूलीच्या हमीवर राज्य सरकार विमान प्राधिकरणाकडे रकमेचा भरणा करेल, शिर्डी विमानतळावर नाइट लँडिंगची कायमस्वरूपी परवानगी मिळवू, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे राज्यातील विमानसेवेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, अंबानींकडून थकबाकीही वसूल केली जाईल. नांदेडसह काही विमानतळ सुरू करणार आहोत. मुंबईत सिंगल रनवेवर ७०० विमाने ये-जा करतात. त्यामुळे राज्यातील विमानसेवेसाठी आवश्यक असलेली सकाळची वेळ मुंबई विमानतळावर मिळत नाही. सकाळचा स्लाॅट मिळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर नाही. काहींना काही स्लाॅट मिळतील यासाठी लवकरच बैठक घेऊ. मात्र नवी मुंबईत नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर पुढील आॅगस्टमध्ये सेवा सुरू होईल तेव्हा मात्र हा प्रश्न सुटेल. असे फडणवीस यांनी सांगितले.

एवढे दर कशासाठी : चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिशय तपशीलासह विमानसेवेवर चर्चा घडवून आणली, असे वारंवार निदर्शनास येत होते. ते म्हणाले की, मुंबईतून अहमदाबादला विमानाने जायचे असेल तर फक्त १९०० रुपये तिकीट आहे. आणि तेच महाराष्ट्रातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ३००० रुपये मोजावे लागतात. एवढे दर कशासाठी, याचाही राज्य शासनाने विचार केला पाहिजे. विमानतळाच्या नाईट लँडिंगचा मुद्दा खूप अवघड, किचकट नाही. महिनाभरात तो एका अधिकाऱ्याकडूनही सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले.

सोलापूरवर ठरवून अन्याय : प्रणिती शिंदे

या विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी २००८ मध्ये परवानगी दिली. ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली. ३३ हेक्टर जागा माळढोक असल्याचे कारण देऊन नाकारली गेली. मात्र त्याच वेळी सुरत-चेन्नई या महामार्गासाठी जागा दिली गेली. त्याचे काम सुरू झाले आहे. पण केवळ राजकारण करून बोरामणीचे विमानतळाचे काम रखडवले गेले. हे राजकारण लोकांना कळत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने ५० कोटी देण्याचे ठरवले होते, तेही थांबविले गेले अशा शब्दांत त्यांना सरकारवर शरसंधान साधले. सोलापूरच्या विमानसेवेबाबत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...