Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मन, मनगट आणि मेंदूच्या एकत्रिकरणातून हिंदवी साम्राज्याची निर्मीती 

Date:

कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : सोळाव्या शतकात तीन महान सत्पुरुषांनी अलौकिक सामर्थ्याने हा महाराष्ट्र धर्म जगवला आणि जागवला. समर्थांनी महाराष्ट्राचा मेंदू तयार केला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राचे मन तयार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे मनगट तयार केले. मन, मनगट आणि मेंदू याचे एकत्रिकरण झाले आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी साम्राज्य उभे राहिले. अशा या सत्पुरुषांच्या विचारांचे अनुकरण सर्वांनी केले पाहिजे, असे मत ह.भ.प. ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी व्यक्त केले. 
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 
वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, समर्थांच्या व्यक्तिमत्वामध्ये भक्ती, शक्ती आणि युक्तीचा एक अनोखा संगम आहे. मानवी मूल्यांचे मोजमाप करताना समर्थ सांगतात विश्वातील प्रत्येक वस्तूही नाशवंत आहे. शरीर देखील नाशवंत असले तरी विचार हे अमर असतात. संत देहाने जरी निघून गेले तरी संतांचे विचार आजही समाजाची धारणा करतात. संतांच्या जीवनाचे अनुकरण करत असताना  देव, देश, धर्म यासाठी मानवाने जगावे आणि मरावे ही शिकवण विसरू नये.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...