पीएमपीएमएलच्या पुण्यदशम ५० बसेस आठवडाभर होत्या बंद..आता होत आहेत टप्प्याटप्प्याने सुरु …

Date:

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट डेपोमधून ५० पुण्यदशम बसेस संचलनात होत्या मात्र दि. ०८जुलै ला यांच्या प्रमाणपत्रांची मुदत संपली आणि या बसेस फिटनेस प्रमाणपत्र मिळेपर्यंत रस्त्यावर येणे बंद झाले .दरम्यान आता कालच ९ बसेस ला फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्याने त्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.आणि आणखी ११ बसेस १९ तारखेपासून फिटनेस प्रमाणपत्र घेऊन धावू लागतील असे pmpml च्या व्यवस्थापनाने कळविले आहे .
या संदर्भात pmpml ने कळविले आहे कि,’ बसेसचे फिटनेस संपल्यामुळे आर.टी.ओ. फिटनेसकामीकारणाने तात्पुरत्या स्वरूपात या बसेस मार्गावर संचलनात नव्हत्या. तथापिशनिवार, दि. १५/०७/२०२३ रोजी ९ बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यामुळे सदर ९ बसेस आता संचलनात आहेत.
बुधवार, दि. १९/०७/२०२३ रोजी ११ बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर या ११ बसेस आणखी संचलनात येणार
आहेत. उर्वरीत बसेस टप्प्याटप्प्याने दि. २२/०७/२०२३ पासून फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर संचलनात येणार
आहेत. पुण्यदशम बसेस फिटनेस अभावी संचलनात येणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरीता त्याच्या जागी
साध्या बसेसची व्यवस्था करणेत आलेली आहे.
पुण्यदशम बसेसचे आर.टी.ओ. फिटनेसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथम संबंधित कंपनी (आयशर) त्यांच्या
पोर्टलवरून सदर बसेसची ऑनलाईन के.वाय.सी. व ऑनलाईन व्ही.एल.टी.डी. सर्टिफिकेट प्राप्त करून देते. सदरची दोन्ही
सर्टिफिकेट कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदर बसेस पीएमपीएमएल कडून आर.टी.ओ. फिटनेससाठी उपलब्ध करून
दिल्या जातात. सदरची प्रक्रिया पीएमपीएमएल मध्ये नवीन असल्यामुळे व प्रथमतःच करणेत येत असल्याने ऑनलाईन
सर्व्हरच्या अडचणीमुळे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करून घेण्यास विलंब होत आहे. सदर कारणास जबाबदार असलेल्या
आयशर बसेसची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करणेत आलेली आहे. तरी प्रवाशांच्या काही
प्रमाणात होत असलेल्या गैरसोयी बद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...