शिक्षणसंस्था चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावा ,अन्यथा ….

Date:

शालेय फी नियंत्रणासाठी प्रभावी अंंमलबजावणीची मागणी

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबत आमदार रवींद्र धंगेकर व ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट

पुणे -शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन कायदा २०११ तील पळवाटा काढून शिक्षण संस्था भरमसाट फी वाढ करत आहेत या संदर्भात मुख्यमंत्री व शिक्षण मत्री यांच्याकडे अध्यक्ष नेमावा व कायदा प्रभावी करण्यासाठी त्यात बदल करण्यात यावा. मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता व शाळेचा सुरू असलेला मनमानी कारभार यांना चाप बसणे गरजेचे आहे, त्यामुळेच आम्ही हा विषय हाती घेतला असून पुणे शहरातील सर्व पालकांना दिलासा मिळेल पर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत राहू. मुलांची सुरक्षा, त्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मिळालेला अधिकार याची जपणूक होण्यासाठी काँग्रेस सातत्याने यापुढे देखील आवाज उठवत राहीलअसे येथे आज आमदार रवींद्र धंगेकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी म्हटले आहे .

शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध अडचणींबाबत आज आमदार रवींद्र धंगेकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी पुण्याच्या प्राथमिक शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली व पालकांना येणाऱ्या अडी-अडचणींबाबत कैफियत शिक्षण संचालक श्री शरद गोसावी यांच्या समोर मांडली.
ते म्हणाले,’ कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणाने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात येत आहे. तर काही ठिकाणी त्यांना इतर मुलांपेक्षा दुय्यम वागणूक देत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांचा शाळांमध्ये हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे संबंधित शाळांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. शाळेतील अनेक अडीअडचणी संदर्भात पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. शाळा ज्या काही गोष्टींची सक्ती करते त्या गोष्टी नियमबाह्य असल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. परंतु याबाबत पालकांना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष नसल्याचे यावेळी लक्षात आल्याने याबाबत यासाठी पालकांचा तक्रार निवारणाचा कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. शाळेमध्ये यापूर्वी क्रीडा प्रकाराला प्राधान्याने व गांभीर्याने घेतले जात होते. परंतु आता खेळासाठी स्वतंत्र शिक्षक देखील नाहीत. मुलांकडून कुठल्याही प्रकारे क्रीडाप्रकार करून घेतले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी शाळा कुठलीही काळजी घेताना दिसत नाहीत. विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीचा प्रश्न देखील यांनी एरणीवर आला आहे. शालेय वाहतूक करताना जी नियमावली आहे, ती प्रत्येक शाळेला सक्तीची करण्यात यावी. शाळांच्या शिक्षणाची गुणवत्ता, तेथील शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या सर्वांवर बोलताना शिक्षण संचालक श्री शरद गोसावी यांनी सांगितले की, “कुठल्याही मुलाला शाळेतून फी भरली नसल्याने शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जर एखाद्या मुलाकडे शाळेचा दाखला नसेल आणि त्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश हवा असेल तर तो प्रवेश देखील देण्यात येईल. शाळेतील मुलांसंदर्भात पालकांच्या तक्रारी असतील तर त्या तक्रार सोडविण्यासाठी पुणे महापालिकेला आदेश देऊन लवकरच प्रत्येक प्रभाग निहाय तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाईल.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की,” स्थानिक पातळीवर शैक्षणिक अडीअडचणी व तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अक्षरशः महिलांनी आपली सोने-नाणे गहाण टाकून मुलांच्या शाळेच्या फी भरल्या आहेत. शिक्षणाची पंढरी असणाऱ्या पुणे शहरात शाळेच्या शिक्षण संस्था चालकांचा हा जो मनमानी कारभार सुरू आहे, त्याला चाप लागला पाहिजे अन्यथा या विरोधात आम्ही विधानभवनात आवाज उठवणार आहोत”.

ज्येष्ठ नेते मोहन जोशी म्हणाले की,”महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन कायदा २०११ याच्या अंतर्गत विभागीय शुल्क नियमक अध्यक्ष हे नेमलेले नाहीत त्यामुळे फी संदर्भातील पालकांच्या तक्रारीच्या सुनावण्या होत नाहित तसेच शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन कायदा २०११ तील पळवाटा काढून शिक्षण संस्था भरमसाट फी वाढ करत आहेत या संदर्भात मुख्यमंत्री व शिक्षण मत्री यांच्याकडे अध्यक्ष नेमावा व कायदा प्रभावी करण्यासाठी त्यात बदल करण्यात यावा. मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता व शाळेचा सुरू असलेला मनमानी कारभार यांना चाप बसणे गरजेचे आहे, त्यामुळेच आम्ही हा विषय हाती घेतला असून पुणे शहरातील सर्व पालकांना दिलासा मिळेल पर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत राहू. मुलांची सुरक्षा, त्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मिळालेला अधिकार याची जपणूक होण्यासाठी काँग्रेस सातत्याने यापुढे देखील आवाज उठवत राहील”.बैठकीसाठी शिक्षण संचालक श्री शरद गोसावी,डॉ.विक्रम गायकवाड,महापालिका शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत,शिक्षणाधिकारी अहीरे साहेब,चेतन अगरवाल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...