अडीच हजार कैद्यांची क्षमता प्रत्यक्षात सात हजार कैदी,आणि बंदोबस्ताला अवघे १८७ पोलीस
पुणे-येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये आपसात मारामारी,गटागटात मारामारी होण्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत,या कारागृहाची अडीच हजार कैद्यांची क्षमता असताना येथे सात हजार कैदी बंदिस्त आहे.त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरती झाल्याने कैद्यात वारंवार धुसफूस हाेण्याचे प्रकारे वाढू लागले आहे.नुकतेच दाेन गटात कारागृहात वादविवाद झाल्यानंतर चार कैदी जखमी झाल्याचा प्रकार घडल्यावर एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला हाेता.आता पुन्हा एकदा येरवडा कारागृहात कैद्यात हाैदावर पाणी भरण्यावरुन राडा झाल्याचा प्रकार घडलेला आहे.
याप्रकरणी न्यायालयीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे,वैभव थिटे व तेजस बाळासाहेब बच्चाव या कैद्यावर येरवडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 324,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत येरवडा कारागृहाचे शिपाई कृष्णा जयवंता वानाेळे (वय-29) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असताना कारागृहातील सीजे विभागातील पाण्याचे हाैदा जवळ सदर चार अराेपी कैदी यांची न्यायालयीन बंदी सुजित प्रकाश टाक याचे साेबत वाद झाले. त्यावेळी आराेपींनी त्यास हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन चाैघांनी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बादल्यांनी त्याच्या डाेक्यात,कपाळावर,उजव्या डाेळयावर, पाठीत मारल्याने त्यास जखमी केल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एस काटे पुढील तपास करत आहे.

