शिंदे – फडणवीस सरकारमध्ये हि क्षमता नाही : बच्चू कडू यांचे विधान

Date:

मुंबई- राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे या सरकारमधील अनेक इच्छूक आमदार नाराज झालेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून येते. आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला आहे.गतवर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले होते. यामुळे अल्पमतात आलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. या घटनेला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असे आम्हाला वाटले नव्हते. या सरकारने काही चांगली कामे केली. त्यामुळे मी नाराज नाही. पण आता मंत्रिमंडळ विस्तार 2024 मध्येच होईल असे वाटत आहे. मी यापूर्वीही हा दावा केला आहे. या सरकारमध्ये ती क्षमता नाही, असे बच्चू कडू यासंबंधी बोलताना म्हणाले.यावेळी त्यांनी गद्दार म्हणून हिणवऱ्यांना न्यायालयात खेचण्याचाही इशारा दिला. ते म्हणाले – आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. याप्रकरणी मानहाणीचा दावा दाखल केला जाईल. आम्ही विकासासाठी त्यांच्यासोबत गेलो. उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...