रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘आधार शिबिर’ व ‘डाक जीवन विमा’ विषयक कार्यशाळा संपन्न

Date:

पुणे-
डाक सेवेच्या संबंधित सरकारी धोरण आणि सुविधांविषयी जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 19 जून 2023 रोजी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयात ‘डाक जीवन विमा’ या विषयावर एक अतिशय महत्त्वपूर्ण कार्यशाळा आणि आधारची माहिती अद्ययावतीकरण व नोंदणीकरण करण्यासाठी ‘आधार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे आणि प्रधान डाक कार्यालय (जीपीओ) पुणे यांच्या द्वारे संयुक्त रूपाने केले गेले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी; पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस आणि अन्य भारतीय रक्षा लेखा सेवेच्या अधिकाऱ्यांद्वारे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर रक्षा लेखा वरिष्ठ उपनियंत्रक श्री ओंकार मोघे आयडीएएस यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप व त्याच्या उपयोगितेविषयी सविस्तर माहिती दिली.
रक्षा लेखा अपर नियंत्रक श्रीमती पनवीर सैनी, आयडीएएस यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाच्या संयुक्त आयोजनासाठी रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालय व प्रधान डाक कार्यालय, पुणे यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) पुणे कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये या कार्यक्रमामुळे जागरूकता निर्माण होईल आणि त्यांच्यात आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण होईल. आधार शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले की आधार ही या देशातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली आहे आणि त्यामध्ये नागरिकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्वांना या शिबिराचा लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबीयांची माहिती देऊन ‘आधार कार्ड’ अद्ययावत करण्यासाठी प्रेरित केले.
पोस्ट मास्टर जनरल श्री आर सी जायभाय, आयपीओएस यांनी आपल्या भाषणामध्ये डाक जीवन विमा योजनेच्या संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की पूर्वीच्या नियमाप्रमाणे फक्त केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते, परंतु आता कोणताही पदवीधारक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतो. प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन सुविधासुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी पुढे सांगितले की एक ग्राहक डाक जीवन विमा योजनेच्या आधारावर दहा टक्के सामान्य व्याजदराने कर्ज प्राप्त करू शकतो; जे अन्य बँकांच्या व्याजदरापेक्षा कमी व लाभदायक आहे. डाक जीवन विमा योजना फक्त एक विमा योजना नसून ती गुंतवणूक करण्यासाठी एक हितकर विकल्प आहे. याबरोबरच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या माध्यमातून चार टक्के व्याजदर असा लाभही आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. आधार माहितीचे अद्ययावतीकरण करण्याबद्दल त्यांनी सांगितले की दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक माहितीचे अद्ययावतीकरण करणे बंधनकारक आहे. आधार शिविर आयोजित करण्यासाठी त्यांनी प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी यांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या हेतूविषयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रधान नियंत्रक डॉ राजीव चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विस्तृत माहिती दिली. डाक विभागाच्या अभूतपूर्व योगदानाची प्रशंसा करत त्यांनी सांगितले की 1884 पासून आजपर्यंत इतक्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये डाक विभागाने जीवन विमा व सामान्य विमाद्वारे अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोककल्याणाचे काम सफलतापूर्वक केलेले आहे. या विभागाने सामान्य नागरिकांना त्यांच्या विषम आर्थिक परिस्थितीमध्ये वित्तीय सहाय्य प्रदान केलेले आहे. कोणत्याही ग्राहकाभिमुख सेवा योजनेचा प्राथमिक उद्देश सामान्य जनतेपर्यंत संतोषजनक रीतीने सेवा पोहोचवणे हे असते. डाक विभागाने हे कार्य कौशल्यपूर्वक साध्य करून दाखविले आहे. त्यांनी पुढे पीएलआय स्कीमविषयी आयोजित कार्यशाळा आणि आधार शिबिराचा लाभ घेण्याचा सल्ला सर्वांना दिला. त्यांनी सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक जागरूकता व चिकित्सक वृत्ती बाळगण्याविषयी सल्ला दिला. शेवटी त्यांनी अशा हितकारक कार्यशाळा भविष्यातही आयोजित करण्याविषयी सर्वांना आश्वासन दिले.
यावेळी डाक विभागाचे पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ अभिजीत इचके, रक्षा लेखा उपनियंत्रक श्रीमती सुनालिनी बोईड, आयडीएएस आणि रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री ऋषिकेश देशमुख,आयडीएएस आयडीएस हे उपस्थित होते. डाक जीवन विमा कार्यशाळेतील सादरीकरणांमध्ये SURAKSHA, SUVIDHA, SANTOSH, SUMANGAL,SURAKSHA व CP यासारख्या अनेक PLI योजनांविषयी विस्तृत माहिती श्री संदीप रेपे यांच्याद्वारे दिली गेली. शेवटी रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक श्री स्वप्निल हनमाने, आयडीएएस यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.