जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट

Date:

शालेय विद्यार्थ्यांना मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव

पुणे, दि.२०: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा परिसर विद्यार्थ्यांनी जणू फुलून गेला होता…मोठ्या उत्सुकतेने भव्य मंडपात प्रवेश करणारे विद्यार्थ्यांचे चेहरे आत जाताच खुलत होते. खेळणी, इलेक्ट्रॉनिक साधने, उपकरणे, विविध खेळ, व्यायामासोबत ज्ञान, हस्तकला, विविध अभ्यासक्रम आणि कौशल्याची माहिती घेताना होणारा आनंद…आणि रोबोटसोबत मज्जा आणि ड्रोनची करामत… शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देताना जणू शालेय विद्यार्थ्यांनी मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव घेतला.

‘जी-२०’ च्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भेट देऊन माहिती घेतली. शहरातील शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी शिक्षक आणि पालकांसोबत येत आहेत. त्यांना सुलभतेने माहिती घेता यावी यासाठी विद्यापीठातर्फे चांगले नियोजनही करण्यात आले आहे.

प्रदर्शनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयटी मुंबई, मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, एनसीईआरटी, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस, राष्ट्रीय बालभवन अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या संधीविषयी माहिती देण्यात येत आहे. एनसीईआरटीने विविध कौशल्याची माहिती पुस्तके, खेळणी आणि प्रतिरुपांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, ई-लर्निंग, रोबोटिक्स, विज्डम वॉल, फोटो मेमरी, विज्ञानाधारीत मॉडेल्स अशा नाविन्यपूर्ण विषयांची माहिती मिळत असल्याने विद्यार्थी उत्साहाने प्रदर्शनाला भेट देत आहेत. काही विद्यार्थी माहितीवर आधारीत टिपणे घेतानाही पहायला मिळत होते. उत्तराखंड, मिझोरम, आसाम अशा दालनात प्रदर्शित त्या-त्या राज्याच्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही घेत आहेत.

हस्तकला कौशल्य जाणून घेण्याची संधी, अभिनव शैक्षणिक साहित्य, मोबाईलपेक्षाही अधिक आनंद देणारे शैक्षणिक खेळ, सोबत सेल्फी पॉईंट, जी-२० लोगोसोबत प्रदर्शनाची आठवण म्हणून ग्रुप फोटो, उपकरणे हाताळताना ज्ञानाच्या बाबतीत मित्रांशी गमतीदार स्पर्धा यासोबतच विविध उपकरणे हाताळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळत आहे. सोबत आवडते कॉमिक्सही भेट मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिकच उत्साह जाणवतो.

एवढे मोठे शैक्षणिक प्रदर्शन प्रथमच पहात असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यांच्यात दडलेल्या क्षमतेला आणि उत्तमतेला चालना देणारे जग जणू त्यांच्यासमोर उभे राहिल्याचा आनंद या प्रतिक्रियांमधून समोर आला. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणारे विद्यार्थी हस्तकलेविषयी तेवढ्याच उत्सुकतेने विविध राज्याच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारत होते. एकूणच या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिक्षणाचे विस्तारलेले विश्व पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना जी-२० च्या निमित्ताने मिळाली. २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

साईराज कागणे, विद्यार्थी- हस्तकला, घरी बनविलेल्या वस्तू, सायकलींग, विविध कलाप्रकार प्रदर्शनात पहायला मिळतात. प्रदर्शनाला भेट देऊन खूप छान वाटते.

मयुरी मस्करे,ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कुल -या प्रदशर्नातून खूप माहिती मिळाली. भविष्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त् ठरेल. अनेक नव्या गोष्टी समजावून घेतांना मजा आली. आयोजनही खूप छान आहे.

राम मुळे, एसनबीपी स्कुल पुणे -नागालँडची खेळणी आणि उत्तराखंडची बांबूकला खूप आवडली, कॉमिक्सही भेट मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला. हस्तकला प्रकार खूपच सुंदर आहेत. कला आणि तंत्रज्ञानाचा छान संगम आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...