राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस साजरा; ‘गुवाहाटी चले जाव’ची घोषणाबाजी

Date:

पुणे : ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस साजरा करत आंदोलन करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करत महाविकास आघाडी सरकारमधील ४० आमदार पळून गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. पुढे या चाळीस आमदारांनी महाराष्ट्राशी गद्दारी करत दिल्लीश्वरासोबत हात मिळवणी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यांच्या या गद्दारीची सर्वांना माहिती व्हावी, या हेतूने आजचा दिवस “गद्दार दिवस” म्हणून पाळण्यात आला तसेच या गद्दारांच्या गद्दारीची खरी ओळख जनतेसमोर यावी यासाठी “50 खोके एकदम ओके” हे आंदोलन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे घेण्यात आले,असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले
या आंदोलन प्रसंगी “आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी”..,
“चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव..!”
“महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त.., “पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…””गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!””महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., “
“खोके सरकारचा चालणार नाही थाट गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट…”
“पन्नास खोके, गद्दार ‘Not’ ओके…”
“खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय… “
अशा विविध घोषणांनी जंगली महाराज रस्त्याचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप पुढे म्हणाले की,” नेहमी आपण कुठलाही दिवस साजरा करत असताना आपल्या राष्ट्राला किंवा आपल्या राज्याला अभिमानास्पद अशा गोष्टी ंचा उत्सव साजरा करतो.आजचा दिवस मात्र गद्दार दिवस म्हणून सगळीकडे कूप्रसिद्ध झाला याला कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसोबत गद्दारी करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस गद्दार आमदारांनी सरकार पाडले होते.महाविकास आघाडी सरकारला पायउतार करत हे गद्दार भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले. संपूर्ण देशाला महागाई बेरोजगारीने वेठीस धरणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन यांनी सत्ता स्थापन केली.आजही राज्यातल्या लहान लहान मुलांना सुद्धा “पन्नास खो… म्हणून विचारले तर ते एकदम ओके…..” असं उत्तर देतात.या गद्दारांना यांच्या कामाचा ठसा उठवता तर आला नाही पण त्यांच्या गद्दारीची चर्चा मात्र गेली वर्षभर अव्यातपणे सुरूच राहिली.महाराष्ट्रात गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर हे गद्दार कुठेतरी राज्याच्या हितावह काम करतील अशा अपेक्षा असताना यांनी मात्र फक्त दिल्लीवाऱ्या केल्या राज्यात येणारे उद्योग गुजरातला नेले, राज्यात येणारा रोजगार गुजरातला नेला. कुठल्याही प्रकारचा मोठा उद्योग राज्यात आणता आला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हे सरकार गेल्या वर्षभरात सपशेल अपयशी ठरले.चर्चा होत राहिली फक्त खोक्यांची. येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेने सज्ज व्हावे” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यानिमित्ताने केले.
आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड,बाळासाहेब बोडके, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, राकेश कामठे, सुषमा सातपुते , महेश हांडे, उदय महाले, राजू साने, अर्चना कांबले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...