पुणे- गेली १० वर्षे पुण्याला पावसाने मुबलक नव्हे तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी पुरवठा केला.पण दर वर्षी महापालिकेने मात्र पाणी कपातीचा खेळ केलाच आता हि पाणी कपात खरोखर पुणेकरांच्या हितासाठी पाणी जपणुकीसाठी असावी अशी समजूत आपली असते पण जिथे टाक्या भरल्या जातात .तिथूनच एकाकीकडे पाणीकपात आणि दुसरीकडे टँकर मागे टँकर पाणी भरून पाण्याची जणू तस्करी होते कि काय ? असा प्रश्न पडेल असे चित्र दिसत असेल तर ?तर हि पाणी कपात टँकर माफियांसाठी तर नाही ?अशी शंका मानता आल्या शिवाय राहत नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी चे अर्बन सेलचे प्रमुख नितीन कदम यांनी येथे व्यक्त केले आहे.
त्यांनी आज सकाळी बारा वाजता पद्मावती पंपिंग स्टेशन येथील पुणे मनपाच्या टँकर पॉईंटला भेट दिली आणि सांगितले ,’
आपण बघत आहात या ठिकाणी शेकडो टँकर भरले जात असून कित्येक टँकर भरण्यासाठी रांगेत उभे आहेत.
दर गुरुवार प्रमाणे संपूर्ण पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा बंद आहे .मग हा नियम यांना लागू नाही का..? प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्या पुणेकर आज पाण्यासाठी हवालदिल झाले असताना हे टँकर कुठे खाली केले जात आहेत..??लांबलेल्या पावसामुळे धरणातील कमी झालेला पाण्यासाठ्या मुळे सहकार्याची भूमिका ठेवत पुणेकर निमुटपणे पाणी कपात सहन करीत असताना पुणे महापालिकेने मात्र टँकर माफियांना मोकळीक दिल्याचे दिसते.याबाबत तातडीने चौकशी जावून संबंधितांवर कठोर शासन व्हायला व्हावे अशी राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहराची भूमिका आणि मागणी आहे अन्यथा याबाबत तीव्र असे आंदोलन आम्ही करू असेही त्यांनी म्हटले आहे.

