उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले – मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल

Date:

शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा

मुंबई-राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

काॅंग्रेस नेत्याशी बोलताना विधान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत बोलताना ‘मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागेल’ असे विधान केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकासआघाडी टिकणार का? आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरस चर्चा रंगल्या. तर दुसरीकडे शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी अशा चर्चांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी आणि सत्ता

राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ साली शरद पवारांच्या पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना भाजप युतीचे बिनसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. जेमतेम अडीच वर्ष सरकार चालले. त्यानंतर फूटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला.

शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा

  • शरद पवार यांची राजकीय भुमिका नेहमीच बदलती राहीली. ते एकाच गोष्टीवर ठाम असातात असे नाही. त्यामुळे त्यांच्या भुमिकेला सहज घेतले जात नाही. शरद पवारांनी २०१४ ला भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा देऊ केला होता.
  • अर्थात सलग दहा ते अकरा वर्षे काॅंग्रेसोबत सत्ता भोगल्यानंतर २०१४ ला आघाडीची हार झाली. या काळात शरद पवारांनी सत्तेसाठी भाजपची साथ देण्याची जाहीर भुमिका घेतली. पण नंतर विरोधी पक्षात बसले.
  • नुकत्याच नागालॅंडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत सात जागा पवारांच्या पक्षाने पटकावल्या. विरोधी पक्षात राहणार असल्याचे पवारांनी सांगितले नंतर सरकारमध्ये सामिल झाले.
  • अर्थात शरद पवारांची भुमिका नेहमी भोवऱ्यासारखी राहीली आहे. याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. ती एक बाब आणि अलिकडे राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक तसेच अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या त्यातून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले असे दिसून येते.

या 4 कारणांनी चर्चा

1) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 15 दिवसांत राज्यात दोन मोठे धमाके होतील, असे वक्तव्य केले होते. यावर प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली टिपण्णी चर्चेत राहिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘एक धमाका दिल्ली आणि एक राज्यात होईल. मात्र, मी वर्तमानात जगणारी आहे. 15 दिवसानंतर काय होणार, हे मी सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

2) अजित पवार यांनी सोमवारचा दौरा रद्द केला. त्यानंतर काही आमदारांसोबत बैठक घेतल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होता. मात्र, आज अजित पवार यांनी ट्विट करून याबाबतचे वृत्त फेटाळून लावले होते. शिवाय शरद पवारांनीही असे काही झाले नसल्याचे सांगितले.

3) अजित पवारांसोबत 40 आमदार आहेत. त्यांनी आमदारांच्या सह्याचे पत्र घेतले आहे. ते भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊ शकतात, असा दावाही काही प्रसारमाध्यांनी केला होता. मात्र, हा दावाही पत्रकार परिषदेत अजित पवारांनी फेटाळून लावला.

4) शरद पवार यांनी अदाणी – हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) गरज नसल्याचे सांगितले होते. काँग्रेसने या विधानापासून स्वतःला चार हात दूर ठेवले. पवारांची ही भूमिका सुद्धा भाजपला सहाय्य करणारी असल्याच्या चर्चा झाल्या. त्यानंतर पवारांनी जेपीसी चौकशीला विरोध नसल्याचे सांगितले.

भाजपचा प्लॅन B

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीचा निकाल कधीही येऊ शकतो. समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाविरोधा गेला. त्यांच्याकडे आमदार आहेत. त्यातले 16 अपात्र होतील. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजपसोबत जाऊन सरकार वाचवतील. मात्र, ही शक्यताही स्वतः अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळत असे झाले तरी सरकार पडणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, चर्चा सुरूच होत्यात. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत आहेत. भाजपला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार सातत्याने या आमदारांच्या संपर्कात आहेत. या आमदारांचे सहमती पत्रही घेतले असून, ते भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र, ते बाहेरून पाठिंबा देतील.

विधानसभेतले चित्र

– एकूण जागा – 288

– बहुमत आकडा 145

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

– एनडीए एकूण – 162

– भाजप – 106

– शिवसेना (शिंदेगट) – 40

– अपक्ष – 12

– इतर – 3

– प्रहार जनशक्ती – 2

महाविकास आघाडी

– मविआ एकूण – 121

– राष्ट्रवादी – 53

– काँग्रेस – 44

– ठाकरे गट – 16

– इतर – 4

– समाजवादी पक्ष – 2

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.