राजकीय वरदहस्त असलेल्या केके मार्केट जवळील’त्या’जुगार अड्ड्यावर छापा,वाँटेड क्रिमिनल सह १४ पकडले

Date:

महापालिकेच्या ट्रक टर्मिनस च्या जागेतच जुगार अड्डा आणि बेकायदा हॉटेल्सची जंत्री …

महापालिका आयुक्त येथे कारवाईला का घाबरतात ?

पुणे- पत्र्याच्या शेडवरच एका राजकीय माजी लोकप्रतिनिधीचे नाव टाकून ,आणि गैरधंद्यांना विरोध करणाऱ्यांना धमक्या देऊन कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या स्वारगेट -कात्रज रस्त्यावरील शंकर महाराज मठ आणि केके मार्केट नजीक असलेल्या ‘त्या’ कथित जुगार अड्ड्यावर अखेरीस पोलिसांनी धाड टाकली .यापूर्वीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही हा अड्डा बिनदिक्कत पणे चालविण्यात येत होता. आता अर्थात हि धाड तात्पुरती दिखाऊ ठरेल कि हा अड्डा कायमचाच बंद केला जाईल हे मात्र पोलिसांच्या पुढील हालचालींवरच दिसून येणार आहे.

या जुगार अड्डयावर छापा टाकुन १४ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख २२,८४०/- रू. किचा मुद्देमाल जप्त केला
के के मार्केट गॅरेज सहकारनगर पुणे येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत बातमीदार मार्फत पोलिसांना सांगण्यात आली.या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन जुगारातील २२,८४०/- रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले १३ इसम व वाँटेड असलेला एक गुन्हेगार सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं.९४/२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमकलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता सहकारनगरपोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे,शहर, रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,पुणे शहर, श्री. देप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे,तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, किशोर भुजबळ या पथकाने केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...