‘या’ खात्यातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल १३ वर्षांपासून बदल्याच झालेल्या नाहीत-आता नाना भानगिरेंनीही दिला आंदोलनाचा इशारा

Date:

पुणे- शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिकेत बदली साठी १० ते ३० लाखाचा भाव फुटल्याची तक्रार नगरविकास मंत्रालयाकडे केल्यावर आणि आंदोलनाचा इशारा दिल्यावर शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनीही ३ वर्षाहून अधिक काळ अनेक अधिकारी बदली न होता आपापल्या मलईदार जागेवर चिकटून असल्याचे म्हटले आहे.मिळकत कर विभागात तर २०१० पासून बदल्याच झालेल्या नाहीत असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.आणि आता या प्रकरणी आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.

नाना भानगिरे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि, दर ३ वर्षांनी बदली करण्याच्या धोरणास हरताळ फसला जातो आहे,अभियंत्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा असली तरी लिपिक ,टंकलेखक,वरिष्ठ लिपिक ,उपाधीक्षक ,अधीक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या २०१२ पासून बदल्याच झालेल्या नाहीत .२०१२ नंतर ज्यांचा वशिला नाहीच अशांच्या बदल्या झाल्यात .कर आकारणी आणि कर संकलन विभागात तर २०१० पासून कर्मचारी आणि अधिकारी तहान मांडून आहेत त्यांच्या बदल्याच होत नाहीत यामुळे त्यांची मक्तेदारी झालेली आहे.हाच प्रकार सामान्य प्रशासन विभाग , मालमत्ता व्यवस्थापन ,मुख्य लेखापाल ,दक्षता विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या १० वर्षाहून अधिक काल झाल्या तरी झालेल्या नाहीत हि वस्तुस्थिती आहे.यामुळे येथे काम करणारे आमच्या शिवाय महापालिकेला पर्याय नाही अशा वल्गना करून मनमौजी पण करत आहेत.आणि प्रतिनियुक्तीवर आलेले शासकीय अधिकारी विनाकारण फाईली अडवून स्वतःबाबत गूढ वाढवून घेण्यात धन्यता मानत आहेत .त्यामुळे सेवक वर्ग विभाग आयुक्तांनी स्वतःच्या अधिपत्याखाली घ्यावा ,इंजिनिअर ,कर विभाग क्लार्क यांच्या नियमानुसार बदल्या तातडीने कराव्यात अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...