भाजपाच्या विरोधात लढणे सोपे नाही आहे,दीड वर्षात अनेकजण गळून पडतील!
चार पक्ष वेगवेगळे लढले आणि एकत्र लढले तरी भाजपाच क्रमांक एक वर असेल!..
पुणे -शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? असा प्रश्न विचारल्यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, “दीड वर्षात अनेकजण गळून पडतील. कारण, भाजपाच्या विरोधात लढणे सोपे नाही आहे.”पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.सावरकर आणि अदाणी प्रकरणात शरद पवारांनी बाजू घेतली की, मध्यस्थी करण्याचे कारणच उरत नाही. शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पाॅॅवरफूल नेते आहेत. ते असल्याशिवाय सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत. ते बाहेर पडले की, बाकीचे गळून पडतात. त्यामुळे शरद पवार सावरकरवादी झाले किंवा सावरकरांवर खालच्या स्तरावर टीका करू नका असे सांगत असतील. अथवा अदाणींची चौकशी जेपीसीने नव्हे तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.. आगामी निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडी बाबत चंद्रकांत पाटील म्हणाले कि मी दोनच दिवसापूर्वी म्हटलं होत कि तीन पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढणं हे आमच्यासाठी चॅलेंज अशासाठी नाही कारण अजून सहा महिन्यांनी महानगरपालिका, त्यानंतर सहा महिन्याने लोकसभा , नंतर विधानसभा एवढा काळ ते एकत्र राहणे शक्य नाही.चार वेगवेगळे लढले तरी आणि एकत्र लढले तरी आम्हीच क्रमांक एक वर आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जे मांडले २०० क्रॉस होईल याबाबत शंकाच नाही असे पाटील यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदाणी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अदाणी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीपेक्षा ( जेपीसी ) सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल, असं मत शरद पवारांनी मांडले होते.
यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “शरद पवार अदाणींची चौकशी जेपीसीने नव्हे, तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

