पुणे-अदानी यांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गौतम अदानी जगातील सर्वात फसवणूकदार व्यक्ती आहे हे निष्पन्न झाले. अदानी याच्या शेअरची किंमत झपाट्याने घसरली असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी यांनी मागील 8 ते 9 वर्षात देशभरातील बँकाची मोठी कर्ज घेतली. एलआयसीला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. 2014 मध्ये अदानी 614 क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, परंतु सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले असे अमेरिका मधील फोर्ब्स मासिकाच्या अहवालात पुढे आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी एसबीआय व इतर वित्तीय संस्थांमधील गैरकारभाराविरोधात अलका टॉकीज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार संजय जगताप , आमदार संग्राम थोपटे, उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अमिर शेख, लता राजगुरू, अजित दरेकर, शिवाजी केदारी, पुजा आनंद, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, साहिल केदारी, राहुल शिरसाट, प्रवीण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शोएब इनामदार, रमेश सकट, भुषण रानभरे, अनिल सोंडकर, भरत सुराणा, राहुल तायडे, रवि आरडे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनावणे, राधिका मखामले, सुमन इंगवले, सौरभ अमराळे, वाल्मिक जगताप, अजय खुडे, राकेश नामेकर, राजू नाणेकर, राजू शेख, गणेश शेडगे, रफिक शेख,सुनिल शिंदे,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या इतिहासात न भूतो न भविष्य असा भांडवली बाजारातील घोटाळा समोर आला आहे. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी गुजरात मध्ये जवळचे संबंध असलेले विजय मल्ला, गौतम अदानी, नीरव मोदी यांच्याशी जवळीक दाखवली. ठराविक उद्योगपती आपल्या जवळचे असल्याचे दाखवणे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आले.
वित्तीय संस्थांनी त्यानुसार नियमांना बगल देऊन या उद्योगपतींना कर्ज दिली. त्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले.अदानी याच्यामुळे एसबीआय बँक आणि एलआयसी संस्था यांचा अस्तिवतवास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता तर त्यांनी याबाबत बोलणे अपेक्षित होते. याबाबत संसदेमध्ये केंद्र सरकार चर्चा घेत नाही. ईडी, सीबीआय धाडी टाकून अनेकांना मेटाकुटीला आणले जाते. परंतु अदानी यांना कोणी विचारणा करत नाही.
अशोक चव्हाण म्हणाले, ज्यांचे पैसे एसबीआय बँक , एलआयसी मध्ये गुंतवले त्यावर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्र सरकारने तातडीने याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे. एलआयसी मध्ये सर्वसामान्य अनेकजण पॉलिसी काढतात ते पैसे पुढील आयुष्यासाठी वापरले जातात. मात्र, त्यांचे पैसे असुरक्षित करण्याचे काम करण्यात येत आहे. अदानी यांचे शेयरमध्ये पैसे गुंतवले गेले आणि शेअर कोसळल्याने हे पैसे नुकसान झाले आहे. अदानी याच्या कंपनी तोट्यात आलेल्या आहे.
हिंडेनबार्ग याचा अहवालबाबत चर्चा केंद्र सरकारकडून झालेली नाही. जनतेचे कोट्यावधी रुपये अदानी यांच्याकडे गुंतवले होते. ते गुंतवणूकदारांना परत दिले पाहिजे. लोकांच्या मनात आक्रोश झाला असून त्यांचे आयुष्य अंधकारमय करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले.

