पुणे-अॅॅड. राहील मलिक युवा मंच व दलित युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी पेठेतील पदमजी गेट येथे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांच्या साक्षीने सामाजिक ऐक्य व सलोखा कायम राहावा अशी प्राथर्ना करून खेळी मेळीच्या व आनंदाच्या वातावरणात रोजा इफ्तार हा पवित्र कार्यक्रम पार पडला .
सदर कार्य्रक्रमाप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ ऍड. राहील मलिक , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन , भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस वसंत साळवे ,दलितमित्र अंकल सोनवणे , राष्ट्रवादीचे नेते रविंद्र माळवदकर ,माजी उपमहापौर हिरामण शिंदे , भगवान वैराट , ऍड. मोहन वाडेकर , मिलिंद अहिरे , धनराज बिरदा , राजेश लोंढे , राजेश गाडे , गौतम वानखेडे , धम्मपाल संघाचे सर्व पदाधिकारी किशोर सोमनाथ गायकवाड , अनिल दामजी , जितेंद्र जठार ,विजय जाधव , अनिल हातागळे , विकास भांबुरे , सतीश लांडगे , अशोक देशमुख , भगवान वायाळ ,अजय पाटोळे , दीप्ती पाटोळे , सतीश लांडगे , महेंद्र जगताप , सुरेश पाटकर , सुरेश रासगे, धम्मप्रकाश शिंदे , अशोक शिरोळे , गणेश जाधव , दिनेश नायकू , किरण क्षीरसागर , सुनील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड. राहील मलिक . असिफ हारून शेख , अनिल अडागळे व दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी इंद्रजित जगन्नाथ सकट, सुफी अन्वर , इब्राहिम शेख , अलीम खान , रहीम सय्यद व सलीम खान यांनी विशेष परिश्रम घेतले .