हे फेकू सरकार आहे – आमदार अनंतराव गाडगीळ

Date:

पुणे-मोदी सरकारच्या काळात सर्वात घोटाळे बँकामध्ये झाले असून ७०६०४ कोटी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत . त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक व आय सी आय सी आय बँक या बँकामध्ये घोटाळे झालेले आहेत ,आतापर्यंत आठ लाख कोटी रुपयांची कर्जे परत आलेली नाहीत त्यामुळे बँकांचा एन पी ए वाढत आहे .,  त्यामुळे मोदी हे फक्त परदेशात बोलतात आपल्या देशात बोलत नाही , त्यामुळे हे फेकू सरकार असल्याचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले .

पुणे कॅम्प भागात डेक्कन टॉवर येथे ‘” फेकू सरकार “…..या विषयावर आमदार अनंतराव गाडगीळ यांचे टॉकिंग पॉईंट द्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . त्यावेळी ते  बोलत होते . या कार्यक्रम अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष   रमेश बागवे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष करण मकवानी , राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , मोदी सरकरने जाहिरातीवर ३७५५कोटी रुपये खर्च केले . एजन्सीला ११०० कोटी रुपये देण्यात आले . मन कि बातला  १०० कोटी , कॅलेंडरला २९९ कोटी रुपये खर्च करण्यात आला . काँग्रेसच्या आणलेल्या योजनांना दुसरी नावे या सरकारने दिल्या आहे . यामध्ये इंदिरा आवास योजनेला पंतप्रधान आवास योजना , निर्मल ग्राम योजनेला स्वछ भारत अभियान , तर राजीव गांधी जीवनदायी योजनेला महात्मा फुले जीवनदायी योजना नावे दिली आहेत . .आज देशात ८९३ प्रकल्पांचे काम रखडले आहे . काँग्रेसच्या काळात बँकामध्ये १३ टक्केच्या पुढे डिपॉजिट होती , परंतु मोदी सरकारच्या काळात सध्या १० टक्केच्या डिपॉजिट नाहीत. एकीकडे पुण्याला स्मार्ट सिटी बनविणार असल्याचे सांगतात . परंतु आर्थिक तरतुदीमध्ये ७ टक्के खर्च करण्यात आला आहे . पुण्यासाठी ५६ प्रकल्पांचे काम करणार होते . त्यामध्ये फक्त १० प्रकल्पांचे काम झालेले आहे . हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे . काशेवाडी कसबा पेठ स्मार्ट सिटी का करत नाही बाणेर औंध भागच स्मार्ट का करतात असा सवाल आमदार गाडगीळांनी उपस्थित केला . पुणेकरांची शुध्द फसवणूक सुरु आहे . पुण्याची मेट्रो हि पालकमंत्री व खासदार यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे रखडली . पुण्याचे खासदार मेट्रो जमिनीखालून न्यायचे सांगतात तर पालकमंत्री मेट्रो जमिनीवरून नेण्याचे सांगतात त्यामुळे पुण्याच्या मेट्रोचे काम रखडले .

गेल्या चार वर्षात लघु उद्योगामध्ये ५० टक्के घट झाली आहे . त्यामध्ये ३५ टक्के कामगार या लघु उद्योगांमधून कमी झालेले आहेत . २९८४ कंपन्या करार झाले परंतु पुढे काय झाले नाही . मेक इन इंडिया कागदावरच राहिली . जी एस टी ची कर प्रणाली चुकीच्या पध्दतीने लावण्यात आली . यामध्ये त्यांनी सांगितले सोन्याच्या बिस्किटाला ४ टक्के , खायच्या बिस्किटाला  १८ टक्के , चॉकलेटला २८ टक्के त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे . शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये  ५८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले . एका फॉर्ममध्ये ६० प्रश्न असल्याने शेतकरी वैतागले , त्यामुळे शेतीचे उत्पादन घातले . संपूर्ण बांधकाम क्षेत्रात मंदी आली आहे . त्यामुळे गवंडी , सुतार , प्लंबर , प्लास्टर कामगार , रंगारी , इलेक्ट्रिक्शन कामगार बेरोजगार झाले आहेत . यामध्ये छोटे व्यावसायिक पूर्णपणे संपले . आणि आर्थिक व्यवस्था कोलमडली . अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प आणला आहे परंतु यामध्ये १२ रेल्वे स्टेशन हे गुजरात मध्ये आहेत तर ४ रेल्वे स्टेशन महाराष्ट्र्रात आहेत तरीदेखील या प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च हा महाराष्ट्र सरकारकडून घेतला जात आहे. या सरकारची नोटबंदी पूर्णपणे फसली आहे . १२० लोक रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडले . नोटाबंदी होऊन  देखील जम्मू काश्मीरमध्ये खोट्या नोटा सापडल्या . तसेच ३८ टक्के दहशतवादी वाढले . ऑनलाईन व्यवहार हा परदेशातील कंपन्यांना काम मिळावे म्हणून ऑनलाइन व्यवहार करण्याचा घाट घातला जात आहे . अमेरिकेत आजदेखील फक्त १९ टक्के लोक ऑनलाईन व्यवहार करतात . तसेच फ्रांस व जर्मनीमध्ये  १ टक्के ऑनलाईन व्यवहार करतात . महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आले . १८ मंत्र्यांचे घोटाळ्याचे आरोप  झाले . सर्वोच न्यायालयातील ४ न्यायमूर्तीनी या सरकारबदल तक्रार केली . देशामध्ये आजमितीला १०७९ न्यायाधीशांची गरज असून फक्त ६०१ न्यायाधीश नेमण्यात आले आहे . त्यामध्ये उच्चं न्यायालयामध्ये ४० लाख केसेस तर सर्वोच्च न्यायालयात ६०००० केसेस प्रलंबित आहेत . हे सरकार मीडियावर दबाव आणण्याचे काम करीत आहे . मोदी सरकार चार वर्ष झाले सत्तेवर आले असून त्यांनी एकदा देखील पत्रकार परिषद घेतलेली नाही . आपल्या विरोधामधील बातम्या दाबण्याचे काम हे सरकार माध्यमांवर दबाव आणून करीत आहे . आजच्या घडीला ११९५ भारतीयांनी परदेशात पैसे ठेवले आहेत . त्यामध्ये २५४२० कोटी रुपये बाहेर आहेत . त्यामध्ये किती पैसे मोदी सरकराने आणले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला .

या कार्यक्रम अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष   रमेश बागवे यांनी सांगितले कि , पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे मोदी सरकारच्या खोटा चेहरा दाखविण्यासाठी लवकरच पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे , हि पुस्तिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे .   काँग्रेस पक्षाने लोकशाही टिकविण्याचे काम केले आहे . जनतेला देखील वाटत आहे कि काँग्रेस सत्तेवर आली पाहिजे . काँग्रेस सरकार चालवू शकते . भाजप दिशाभूल करून सरकार चालवीत आहे . यापुढच्या काळात काँग्रेस पक्ष बूथ कमिट्या मजबूत करण्याचे काम करणार आहे .   माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे संयोजन  पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले . तर आभार पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...