Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी-माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

Date:

पुणे-आम्ही आज आरक्षणासाठी भांडत बसलो आहोत , तर दुसरीकडे नोकरभरती न करता कंत्राटी पध्दतीने कामे करून घेतली जात आहेत . सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी असून त्याविरोधात मजबूत संघटन उभे करण्याची गरज आहे , असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले .

दलित महासंघातर्फे समता भूमीमधील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित सावधान परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील  बोलत होते . या परिषदेचे अध्यक्षस्थानी   दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मछिंद्र सकटे हे होते . यावेळी   युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर , प्रा. श्रावण देवरे , समतावादी महिला मंचाच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे , डॉ. गेल अम्रवेट , पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट , पुणे शहर महिला अध्यक्षा  लक्ष्मी पवार आदी मान्यवर उपस्थित होते .

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील म्हणाले कि , जातीयता इतकी विषारी आहे कि , ती आपल्या डोक्यातून कधीच जात नाही . त्यामुळे डोक्यातून जातीला बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे .

या परिषदेचे अध्यक्ष  दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मछिंद्र सकटे यांनी सांगितले कि भिमाकोरेगावचे रणसंग्राममध्ये पेशवाई विरुद्ध लढताना मातंग समाजानेही शौर्य गाजविले आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाज हा शूरवीरांच्या समाज आहे . फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचा विचार स्वीकार करून अन्यायी ब्राम्हण्यवाद उध्वस्त करण्यासाठी समतेच्या चळवळी मध्ये सक्रिय व्हावे . व  त्यांनी सावधान परिषदेमागील उद्देश आणि हेतू स्पष्ट केला . ब्राम्हणी संस्कृतीने  हजारो वर्ष भारतामध्ये सामाजिक ऐक्य टिकू दिले नाही , जातीवादी विषमतावादी व्यवस्थेचे  ब्राम्हणवादाला जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे . त्यामुळे भारतातील  ब्राम्हणवाद संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघमुक्त भारत झाला पाहिजे , अशा प्रकारचा ठराव दलित महासंघाचे आयोजित केलेल्या सावधान परिषदेमध्ये करण्यात आला .

यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले कि , जेथे अक्कल असते तिथे ज्ञान कमी असते . जो जात मानतो तो मर्यादित बुध्दिचा असतो , त्याला इतर जातीचा आंनद घेता येत  नाहीं  जातिमुक्त होऊन माणूस होण्याचा आनंद घेतला पाहिजे .

यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले कि , भिमा कोरेगाव दंगलीत जबाबदार असणाऱ्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यापैकी मिलिंद एकबोटेला अटक झाली परंतु , भिडेला अटक झालेली नाही . त्यामुळे एकबोटेला एक न्याय व भिडेला  वेगळा न्याय कशासाठी त्यामुळे संभाजी भिडेला त्वरित अटक झालीच पाहिजे .

यावेळी  प्रा. पुष्पलता सकटे यांनी सांगितले कि , भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर झालेल्या दंगलीत मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे जबाबदार असूनही न्यायालयाच्या आदेशानंतर एकबोटेला अटक झाली असली तरी मनोहर भिडे अजूनही मोकाट आहे . भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर सरकार आणि पुरोगामी नेत्यांची दुटप्पी भूमिका सर्वासमोर आली आहे . संसदेमध्ये स्त्रियाविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध केला पाहिजे .

या परिषदेमध्ये आनंद वैराट व सुहास नाईक यांनी संपादित केलेले ” भीमा कोरेगाव विजय स्तंभ व्दिशताब्दी गौरव ग्रंथाचे”  प्रकाशन करण्यात आले .

या परिषदेमध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दलित महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार सहदेव खंडागळे यांनी मानले .

हि सावधान परिषद करण्यासाठी खंडू पवार , चिंतामण वैराट , बाबा भिसे , पंकज शेलार , योगेश भिसे , मंगेश पोकळे , जयवंत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...