सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी-माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

Date:

पुणे-आम्ही आज आरक्षणासाठी भांडत बसलो आहोत , तर दुसरीकडे नोकरभरती न करता कंत्राटी पध्दतीने कामे करून घेतली जात आहेत . सध्याची व्यवस्था हि कष्टकऱ्यांचे शोषण करणारी असून त्याविरोधात मजबूत संघटन उभे करण्याची गरज आहे , असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले .

दलित महासंघातर्फे समता भूमीमधील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात आयोजित सावधान परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील  बोलत होते . या परिषदेचे अध्यक्षस्थानी   दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मछिंद्र सकटे हे होते . यावेळी   युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर , प्रा. श्रावण देवरे , समतावादी महिला मंचाच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे , डॉ. गेल अम्रवेट , पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट , पुणे शहर महिला अध्यक्षा  लक्ष्मी पवार आदी मान्यवर उपस्थित होते .

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील म्हणाले कि , जातीयता इतकी विषारी आहे कि , ती आपल्या डोक्यातून कधीच जात नाही . त्यामुळे डोक्यातून जातीला बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे .

या परिषदेचे अध्यक्ष  दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मछिंद्र सकटे यांनी सांगितले कि भिमाकोरेगावचे रणसंग्राममध्ये पेशवाई विरुद्ध लढताना मातंग समाजानेही शौर्य गाजविले आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाज हा शूरवीरांच्या समाज आहे . फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचा विचार स्वीकार करून अन्यायी ब्राम्हण्यवाद उध्वस्त करण्यासाठी समतेच्या चळवळी मध्ये सक्रिय व्हावे . व  त्यांनी सावधान परिषदेमागील उद्देश आणि हेतू स्पष्ट केला . ब्राम्हणी संस्कृतीने  हजारो वर्ष भारतामध्ये सामाजिक ऐक्य टिकू दिले नाही , जातीवादी विषमतावादी व्यवस्थेचे  ब्राम्हणवादाला जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे . त्यामुळे भारतातील  ब्राम्हणवाद संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघमुक्त भारत झाला पाहिजे , अशा प्रकारचा ठराव दलित महासंघाचे आयोजित केलेल्या सावधान परिषदेमध्ये करण्यात आला .

यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले कि , जेथे अक्कल असते तिथे ज्ञान कमी असते . जो जात मानतो तो मर्यादित बुध्दिचा असतो , त्याला इतर जातीचा आंनद घेता येत  नाहीं  जातिमुक्त होऊन माणूस होण्याचा आनंद घेतला पाहिजे .

यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले कि , भिमा कोरेगाव दंगलीत जबाबदार असणाऱ्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यापैकी मिलिंद एकबोटेला अटक झाली परंतु , भिडेला अटक झालेली नाही . त्यामुळे एकबोटेला एक न्याय व भिडेला  वेगळा न्याय कशासाठी त्यामुळे संभाजी भिडेला त्वरित अटक झालीच पाहिजे .

यावेळी  प्रा. पुष्पलता सकटे यांनी सांगितले कि , भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर झालेल्या दंगलीत मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे जबाबदार असूनही न्यायालयाच्या आदेशानंतर एकबोटेला अटक झाली असली तरी मनोहर भिडे अजूनही मोकाट आहे . भिमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर सरकार आणि पुरोगामी नेत्यांची दुटप्पी भूमिका सर्वासमोर आली आहे . संसदेमध्ये स्त्रियाविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध केला पाहिजे .

या परिषदेमध्ये आनंद वैराट व सुहास नाईक यांनी संपादित केलेले ” भीमा कोरेगाव विजय स्तंभ व्दिशताब्दी गौरव ग्रंथाचे”  प्रकाशन करण्यात आले .

या परिषदेमध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दलित महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार सहदेव खंडागळे यांनी मानले .

हि सावधान परिषद करण्यासाठी खंडू पवार , चिंतामण वैराट , बाबा भिसे , पंकज शेलार , योगेश भिसे , मंगेश पोकळे , जयवंत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...