राजकारणात इंटेलिजेंस कोशियंटपेक्षा भावनिक गुणधर्म महत्वाचेः सारंगी

Date:

पुणे, दि.१३ मार्च: “राजकारणात इंटेलिजेंस कोशियंटपेक्षा भावनिक गुणधर्म अधिक महत्वाचा आहे. आपल्यावर होणार्‍या टीकांना सकारात्मकेतेने स्वीकारून त्याचे उत्तर समर्पित कार्याद्वारे दयावे. तसेच, राजकारणात अंतिम लक्ष लोकांसाठी काम करणे हे आहे हे सदैव ध्यानात ठेवावे.” असा सल्ला भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार अपराजित सारंगी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १६ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा २४ मार्च पयर्र्त दिल्ली येथे राष्ट्रीय अभ्यास दौरा सुरू आहे. मिटसॉगचे प्राध्यापक परिमल सुधाकर आणि संकल्प संघई हे या दौर्‍याचे नेतृत्व करीत असून यामध्ये २२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या अभ्यास दौर्‍यात देश पातळीवरील राजकारणाची आणि सरकारची इत्यंभूत माहिती मिळविणे, संसदेचा कारभार, राजकीय पक्षांच्या कार्यालयाची भेट, राष्ट्रीय नेत्याशी संवाद साधणे या अभ्यास दौर्‍याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोग, नीति आयोग, विविध मंत्रालये येथील अधिकार्‍यांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
त्यानुसार १० मार्च रोजी विद्यार्थ्यांनी भारतातील प्रजासत्ताक कोरियाचे राजदूत अं. शिन बोंगकिल, दिल्लीचे माजी आमदार कपिल मिश्रा, राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचे मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्याशी विशेष भेट त्या त्या विभागाच्या माध्यमातून चालविल्यात येणार्‍या कार्याची माहिती घेतली.  यावेळी अं. शिन बोंगकिल यांनी दक्षिण कोरिया करीत असलेल्या गुंतवणूकीवर विचार मांडले. भारतीय लोकशाहीचे कौतुक केले. राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांनी शहरी व ग्रामीण भागातील वाढत जाणारे अंतर आणि गरीबीसमोरील आव्हाने यावर त्यांनी भाष्य केले. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की राजकारणात येतांना आपली विचारसरणी आणि तत्वांवर कधीही तडजोड करू नका. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम बनावे.
त्यानंतर ११ मार्च रोजी म्हणजेच तिसर्‍या दिवशी या अभ्यास दौर्‍यातील विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाची अविभाज्य शाखा इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॉसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटला भेट देऊन येथील कार्यपद्धती समजवून घेतली.
एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांना भेटल्यानंतर त्यांनी  राजकारणातील खाचे खळगे समजावून सांगितले. नंतर आयुष मंत्रालयाला भेट दिल्यानंतर ते सरळ राज्यसभेचे द्रमुक सदस्य तिरूची शिव यांना भेटले. त्यांनी विद्यार्थ्यांना राजकारणातील मुलभूत गुणांवर जोर देऊन सहिष्णूता, संयम, धैर्य आणि दृढनिश्चय हे गुण अंगी आणण्याचा सल्ला दिला. माजी आयआरएस अधिकारी व खासदार श्रीमती सुनीता दुग्गल यांच्या संवाद साधतांना महिला सबलीकरणावर जोर देण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रीय दौर्‍याच्या चौथ्या दिवशी या विद्यार्थ्यांनी लोकसभा सदस्य श्रीमती अपराजिता सारंगी, मुख्य माहिती अधिकारी वाय. के. सिन्हा आणि भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त डॉ.विवेक जोशी यांच्या संवाद साधला.
यावेेळी वाय.के सिन्हा यांनी कायदा, उपद्रव आणि आरटीआय कायद्याची चौकट योग्य दिशेने कशी सुरू आहे हे सांगितले. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयांवर अवलंबून आहे असे ही ते म्हणाले.
विवेक जोशी यांनी लोकसंख्या मोजणीची कार्यपद्धती सांगितली. प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचा डेटा संकलित कार्यपद्धतीची माहिती दिली. लोकशाहीचा पाया जनगणना हे ही समजावून सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...