माध्यम हक्कांचे वापर समाज कल्याणासाठी व्हावे -कश्मीर विधानसभेचे अध्यक्ष हाजी अनायत अली

Date:

पुणे, ता. १८ :- देशाला स्वतंत्रता अनेक संघर्ष आणि बलिदानामुळे मिळाली आहे. आमच्या हक्कांना समाजाच्या कल्याणासाठी वापरल्यास देशात शांतता नांदेल. समाजाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी सोशल माध्यमाच्या वापर व्हावा. फेक न्यूजपासून जागृक राहत सोशल माध्यमातील आपल्या हक्कांना समाजाच्या हितासाठी वापरावे, असे प्रतिपादन जम्मू कश्मीर विधानसभाचे अध्यक्ष हाजी अनायत अली यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रातील फेक न्यूज आणि सोशल मिडिया या विषयावर ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि इंडियन एक्सप्रेस पुणेचे निवासी संपादक अमिताभ सिन्हा, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व प्रमुख निमंत्रक आणि एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. धारूरकर, पंजाबचे विद्यार्थी नेते नवज्योत कौर, छत्तीसगडचे विद्यार्थी नेते शैलेश कुमार पांडे, तेलगणातील विद्यार्थी नेते पी. केशवन, महाराष्ट्राचे विद्यार्थी नेते इमाद यु हुसैन आदी उपस्थित होते.

हाजी अनायत अली म्हणाले, सोशल मिडियामुळे क्रांती आली. मात्र त्याचे दुष्परिणाम होताना दिसत आहे. सोशल मिडिया चुकीच्या बातम्या पसरविण्याचे मोठे माध्यम बनले आहे. ते समाजासाठी हानीकारक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत, मात्र याच माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवत अशांतात निर्माण केली जात आहे. राजकीय लोक चुकीचे वक्तव्य करतात, त्याच्या फेक न्यूज बनतात. त्याचे विपरित परिणाम समाजावर होते. आमच्या हक्कासाठी अनेकांनी बलिदान दिले, या बलिदानाचा अनादर करत सोशल मिडियातून हक्कांची पायमली होताना दिसत आहे. युवकांनी चुकीच्या घटना आणि बातम्यांना पसरवू नये. सोशल मिडियात सुशिक्षित नागरिक चुकीच्या बातम्या परसवितात. मानवतेच्या अकल्याण आणि अशांततेसाठी या मिडियाचा वापर होताना दिसत आहे. मात्र यातून बाहेर येत समाजाच्या शांततेसाठी काम करण्याची आता गरज आहे. शांततेसाठी सोशल मिडियाचा उपयोग व्हावा.
अमिताभ सिन्हा म्हणाले, फेक न्यूज विषयी आपण कसे डील करता याकडे लक्ष असावे. सोशल माध्यमातून सकारात्मक विचार पसरविण्याची आवश्यकता आहे. चुकीच्या बातम्या न तपासता पसविल्या जातात. काही फेक न्यूज जाणूनबाजून पसरविल्या जातात. काही बायस असतात, हे समाजासाठी घातक आहे. सोशल मिडिया हे तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर चांगल्या माहितीसाठी आणि समाज हितासाठी व्हावे. या माध्यमाद्वारे आपल मत, विचार मांडू शकता, मात्र अविचार पसरविण्याचे आणि फेक न्यूज माध्यमातून तणाव पसरविला जात आहे. फेक न्यूज पसरविणे हा गुन्हा आहे. सोशल माध्यमाचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रामध्ये बातम्यांची पडताळणी करूनच छापली जाते. सोशल मिडिया मोठे माध्यम आहे. सोशल माध्यमाचा वापर सकारात्मक विचाराच्या प्रसारासाठी करावा.
नवज्योत कौर म्हणाल्या, सोशल मिडिया हा आपले विचार मांडण्याचे चांगले माध्यम आहे. फेक न्यूजच्या माध्यमातून समाजाला अशांत करण्याचा डाव आहे. उघड्या डोळ्यांनी सरासार बुद्धीने विचार करत सोशल मिडियाचा वापर करणे आवश्यक आहे.
शैलश कुमार पांडे म्हणाले, सोशल माध्यम चुकीच्या बातम्याचे व्यसपीठ झाले आहे. सर्वांच्या भावनांशी खेळ होत आहे. संचारच्या या वरदान अभिशापमध्ये बदलले आहे. अनेक वेबसाईटच्या माध्यमातून चुकीच्या फोटोसह व्हिडिओची ओळख पडू शकते. मिडियाला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.
पी. केशवन म्हणाले, सोशल मिडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरविले जात आहेत. युवकांनी याची खात्री करूनच पुढे पाठवावे. फोटो आणि व्हिडिओ एडिट करून राजकीय नेते परसवितात. त्यावर विश्वास ठेऊ नये. खात्री करणे आवश्यक आहे. बातम्या तपासून पाहणे आवश्यक आहे.
इमाद उल हसन म्हणाले, फेक न्यूज मुळे अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. फेक न्यूज हे समाजात अशांतता परसविण्याचे शस्त्र झाले आहे. सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी पडताळणी करूनच सोशल माध्यमामध्ये बातम्या पसरवाव्यात.
प्रा. डॉ. व्ही. एल. धारूरकर यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट आणि नलिनी शर्मा यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...