‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार!’ या विषयावर ३ दिवसीय ज्ञान-जागर

Date:

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणेतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकांनंद यांच्या १५६ व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार, दि. १० ते शनिवार दि. १२ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरू’ होणार!’ या स्वामीजींच्या सन १८९७ च्या वचनांवर आधारित, ‘ज्ञान जागर’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम, विश्‍वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती सभागृह आणि विश्‍व शांती ग्रंथालयात आयोजित करण्यात आला आहे.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी १८९७ साली असे भाकीत केले होते, की ‘२१ व्या शतकात माझी भारतमाता जगात ‘ज्ञानाचे दालन’ म्हणून उदयास येईल व विश्‍वगुरु म्हणून तिची जगासमोर ओळख निर्माण होईल’. त्यांच्या या वचनावर आधारित एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठातर्फे ‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार! या विषयावर तीन दिवसीय ‘ज्ञानजागरा’चे आयोजन केले आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे वर्णन करताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानी येते, ती म्हणजे हजारो वर्षापासून या आपल्या मातृभूमीमध्ये मुख्यत्वे दोन गोष्टींची पूजा केली गेली. त्यातील पहिली ‘ज्ञानाची पूजा’ आणि दुसरी ‘सत्याची पूजा’. संपूर्ण विश्‍वामध्ये ज्ञान हेच एकमेव सत्य! या विश्‍वाचे एक अंतिम चैतन्यस्वरूप हे सुध्दा ज्ञानस्वरूपच होय! संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या खालील उक्तीनुसार याची प्रचिती येते..

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्व संवेद्या । आत्मरूपा ॥

या पार्श्‍वभूमीवर एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाने पहिल्यांदाच विश्‍वात्मक चैतन्यस्वरूप ‘ज्ञान’ या विषयावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने आणि कीर्तन / प्रवचने आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये गुरुवार, दि. १० जानेवारी २०१९ रोजी दु. ३.३० वा. संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ, परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते या ज्ञानजागरचे उद्घाटन होणार असून डॉ. विजय भटकर आणि ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचा ओवीबध्द इंग्रजी अनुवार करणार्‍या स्वामी राधिकानंद सरस्वती यांचे ‘ज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संध्या. ५.३० वा. सुप्रसिद्ध गायक डॉ. महेश काळे हे ज्ञानस्वरूप भक्ती-संगीत कीर्तन सादर करतील.

शुक्रवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी हिमालयस्थित गुरू श्री. योगी अमरनाथजी व विज्ञानवादी वैदिक अभ्यासक श्री. प्रविण राजपाल यांची ‘ज्ञान’ विषयावर व्याख्यानं होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.१५ वा. औसा संस्थानचे प्रमुख ह.भ.प. श्री. गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भजन/कीर्तन होणार आहे.

शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, संतस्वरूप व ज्ञानस्वरूप विभूती उडुपी, कर्नाटक येथील पेजावर मठाचे ज्ञानमठाधिपती प.पू. आदरणीय श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजींना शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आणि विश्‍वशांती व विश्‍वकल्याणाच्या कार्याबद्दल, ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्म ऋषी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. विजय पां. भटकर आणि शांतिब्रह्म ह.भ.प. श्री. मारूती महाराज कुर्‍हेकर यांच्या शुभहस्ते आदरपूर्वक अर्पण करण्यात येईल.

अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि जगप्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय पां. भटकर यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...