Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद विवाद सामोपचाराने सोडवावा,मध्यस्थी याचिका सर्वोच्च न्यायालयात

Date:

पुणे : भारतीय संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अयोध्या येथील रामजन्मभूमी बाबरी मस्जिदच्या विवादास्पद २.७७ एकर भूमीबद्दलचा ज्वलंत प्रश्‍न हिंदू व मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सामोपचाराने व सामंजस्याने सोडवावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा आदर करून विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका  (Intervention Application) दाखल करण्यात आली.
या मध्यस्थी याचिकेमध्ये खालील मुद्यांचा समावेश आहे.
१. प्रभु श्रीरामचंद्रांचे एक भव्यदिव्य आणि सुंदर असे मंदिर प्रत्यक्ष मूळ रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या २.७७ एकर विवादास्पद भूमीवरच सर्व विवाद मिटवून, सर्व पक्षीयांची मान्यता मिळवून बांधण्यात यावे.
२. श्रीरामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या २.७७ एकर जमीनी लगत असलेल्या ६७ एकर भारत सरकारद्वारा अधिग्रहित/संपादित संपूर्णपणे मोकळी व पडीक जमीन, शासनातर्फे, मानवता, सहिष्णुता व विश्‍वशांतीचा संदेश देणार्‍या, भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे एक मूर्तिमंत स्वरूप म्हणून उदयास येऊ शकेल अशा ‘विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन’च्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, ज्यायोगे त्यावर हिंदू, इस्लाम, ख्रिश्‍चन, बौध्द, शीख, जैन, पारसी, ज्यू अशा विविध धर्मींयांची भव्यदिव्य व सुंदर अशी मंदिर, मस्जिद, चर्च, विहार, गुरुद्वारा इ. प्रार्थनास्थळे, त्या त्या धर्मांच्या संकल्पना व श्रद्धेनुसार उभारता येऊ शकतील.
३. अयोध्या येथील मूळ रामजन्मभूमीच्या जागेवर प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य व सुंदर मंदिर व त्या लगतच्या मोकळ्या व पडीक जागेत विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन समन्वयाने व सामंजस्याने उभारण्यासाठी, भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत देशातील नामवंत व जाणकार शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक भान असलेले विविध पक्षातील व धर्मातील नेते आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक सत्तावीस (२७) सदस्यीय अखिल भारतीय सुकाणू समिती स्थापन करून हा प्रश्‍न सामोपचाराने सोडविण्यात यावा.
एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, नालंदा विद्यापीठाचे कुलपती  आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या  विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन या अभूतपूर्व अशा ऐतिहासिक स्वरूपाच्या प्रस्तावाबद्दल आपल्या भारत देशाच्या हिताच्या व सर्व समाजाच्या कल्याणाच्या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तत्त्वचिंतक, एक थोर राजनैतिक विचारवंत,  डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी आपली प्रांजळ भावना व्यक्त करताना अगदी सकारात्मक भाषेमध्ये सांगितले की, ‘एक दिवस अयोध्या येथील विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन हे संपूर्ण जगाचे मानवता धर्माचे विश्‍वतीर्थ म्हणून उदयास येईल आणि संपूर्ण जगाला मानवतेचा, सर्वधर्मसमभावाचा आणि विश्‍वशांतीचा संदेश देईल आणि २१ व्या शतकामध्ये आपला भारत देश ‘ज्ञानाचे दालन’ व ‘विश्‍वगुरू’ म्हणून उदयास येईल.’
अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिरासहित मानवता व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या  विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या उभारणीमुळे अयोध्या नगरी ही केवळ भारताचीच नव्हे तर, संपूर्ण जगाची सांस्कृतिक व अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाईल, असाही विश्‍वास डॉ.  वेद प्रताप वैदिक यांनी व्यक्त केला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...