महाराष्ट्रातील पुरातत्व खात्याकडे असलेल्या वास्तूंची तसेच पानिपत येथील स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीबाबत मुंबईत मे मध्ये बैठक…

Date:

महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये घेतली पुरातत्व महासंचालक समवेत बैठक

न्यू दिल्ली, ता.६: पानिपत येथील मराठा योद्ध्यांच्या स्मारकामध्ये आवश्यक सुविधा करणे, एकवीरा देवी व लेण्याद्री देवस्थान तसेच राज्यातील इतर महत्वाचे ठिकाणांना भेडसावत असलेले प्रश्न सोडविण्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल लोकसभा अध्यक्ष मा.ओम बिर्ला आणि आज पुरातत्व महासंचालक व्ही. विद्यावती यांना निवेदन दिले. याबाबत आज दि.०६ एप्रिल, २०२२ रोजी व्ही. विद्यावती यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत, योग्य ती सकारात्मक पावले उचलू असे प्रतिपादन यावेळी मा.श्रीमती व्ही विद्यावती यांनी केले.

डॉ.गोऱ्हे यांनी पानिपत स्मारकाची पाहणी केली होती. यात समोर आलेल्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा याबैठकीत झाले. यात पानिपत स्मारकामध्ये ऐतिहासिक युद्धाबाबत सविस्तर माहिती पुस्तिका व माहितीपत्रके ऊपलब्ध करावी, वाचनालय चालु करावे, प्रकाश योजना व ध्वनी चित्र फीत असलेला साऊंड शो सुरु करावा, सुरक्षेसाठी होम गार्ड व्यवस्था करावी तसेच CCTV बसविणेबाबत व इतर सोयी साठी मान्यता द्यावी अशी सूचना केली याबाबत हरियाणा प्रशासनास ना हरकत प्रमाणपत्र देऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे श्रीम विद्यावती यांनी सांगितले.तसा प्रस्ताव हरियाणा देण्यास दि. ३ एप्रिलच्या बैठकीत हरियाणा स्थानिक अधिकारी यांना सांगितले असुन या पुर्वीचे पुरातत्व विभागाकडे दिलेले प्रस्तावही संबंधित विभाग प्रलंबित आहेत याकडेही नीलम गोर्हेंनी लक्ष वेधले. त्यांवर या कार्यवाहीस पुर्ण सहकार्य देऊ असे श्रीमती विद्यावती यांनी सांगितले .

मुंबईत विधान भवनमध्ये मे महिन्यात महाराष्ट्रातील या विषयासंदर्भात असलेल्या प्रश्नाबाबत बैठक घेऊ व त्या बैठकीस श्रीमती व्ही विद्यावती यांनी उपस्थित राहण्याबाबत विनंती केली. केंद्रीय पुरातत्व विभागाने प्रत्येक ३ महिन्याला घेतलेल्या निर्णयाबाबत आवश्यक प्रसिद्धी द्यावे असे ही सांगितले.
त्यावेळी श्रीमती विद्यावती महासंचालक पुरातत्व विभाग यांना डॉ गोऱ्हे यांच्या सूचनांचे स्वागत करून महाराष्ट्रातील पुरातत्व विभागाच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पूढील महिन्यात मुंबई मध्ये नक्की बैठक घेऊ व विषय सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे डॉ गोऱ्हे यांना आश्वासीत केले. पानिपतच्या स्मारकामधील ज्या कामासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे त्या तात्काळ देण्यासाठी सूचना देत आहे, असे सांगितले. तसेच जी कामे होणार आहेत,सुरू आहेत व पूर्ण झालीत त्यांची माहिती सविस्तर जाहीर केली जाईल, तर केंद्रिय पुरातत्व विभागात महाराष्ट्राच्या अनुषंगाने होणारे महत्त्वाचे निर्णय प्रत्येक ३ महिन्याला महाराष्ट्र विधिमंडळ ला कळविणेचे ही मान्य केले.
याबैठकीत एकवीरा व लेण्याद्री देवस्थान मधील भाविकांसाठी महत्वाच्या सोयीसुविधा यांना मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत डॉ गोऱ्हे यांनी विनंती केली. त्यास श्रीमती विद्यावती यांनी तात्काळ निधी दिला जाईल असे यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...