मुंबई, दि. ३१ जानेवारी – कुठल्याही प्रकारची माहिती न घेता गुजरातच्या प्रकल्पात भ्रष्टाचार झालाय असे जर मुंबईच्या महापौर म्हणत असतील तर ते अत्यंत बेजबाबदारपणाचे ठरेल. कारण गुजरातमध्ये सायन्स सेंटरचा तो एक मोठा प्रकल्प आहे. त्याचा एक भाग वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि इतर सर्व यावर तो खर्च झाला आहे. फक्त पेंग्विनवर झालेला नाही. इथे जो खर्च झालेला आहे तो फक्त पेंग्विनवर झालेला आहे. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकल्पाची इथल्या प्रकल्पाशी तुलना होऊ शकत नाही. महापौरांनी गुजरातच्या प्रकल्पाशी तुलना करण्यापेक्षा इथल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
गुजरातच्या वाइल्ड प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच गुजरातच्या प्रकल्पाची आणि मुंबईच्या राणीबाग पेंग्विन प्रकरणाची तुलना महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. त्यावर दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, त्या मुंबईच्या महापौर आहेत. गुजरातचे काय करायचे असेल तर खासदार असतील, आमदार असतील, देशपातळीवरच्या नेत्यांनी ते बघावे. गुजरातचे प्रकल्प बघून तसे इथे राबवणार असू तर त्याचे स्वागतच आहे. परंतु आज मुंबईमध्ये अनेक समस्या आहेत. आजही मुंबईमध्ये मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. शौचालये नहीत, प्यायचे पाणी मिळत नाही. आज गटारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबईतले अनेक नागरी प्रश्न आहेत. प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यांना जास्तीत जास्त गती देऊन ते प्रकल्प गतीने पुढे गेले तर महापौरांना आम्ही धन्यवाद देऊ.
गुजरातला जाऊन वेळ फुकट घालवण्यापेक्षा तेवढा वेळ मुंबईकरांच्या सेवेत जर दिला तर त्याचा उपयोग होईल आणि मुंबईकर त्यांना धन्यवाद देतील.
गुजरातला जाऊन केवळ राजकारणापोटी तेथील माहिती काढायची आणि येथे तुलना करायची हे काही योग्य नाही. सोयीप्रमाणे दुसऱ्या राज्यातले भाजप योग्य आहे, दुसऱ्या राज्यात चुकीच्या गोष्टी झाल्या की, इथले उदाहरण द्यायचे आणि इथे चुकीच्या गोष्टी झाल्या की दुसऱ्या राज्यातील भाजपचे उदाहरण द्यायचे, सोयीने चांगले, सोयीने वाईट, अशा प्रकारच्या यांच्या भूमिका आहेत.
गुजरात भाजप तर देशाचे नेतृत्व करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब , अमित शाह साहेब आज देशाचे नेतृत्व करतात. आणि त्यामुळे गुजरातचे भाजप चांगले, याचा अर्थ देशाचे नेतृत्व करणारे नेते मंडळी चांगलीच आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातील भाजप चांगली आहे हे त्यांनी नकळत सांगून टाकलेय, असेही दरेकर यांनी सांगितले

