मराठी बांधकाम व्यावसायिकांनी गड- किल्ल्यांसाठी योगदान द्यावे-खासदार छत्रपती संभाजीराजे

Date:

पुणे -मराठी बांधकाम व्यावसायिकांनी राज्यातील गड-किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योगदान द्यावे असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.महाराष्ट्र स्तरावरील ‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघा’ची स्थापना आज येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ते बोलत होते .

या कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे

गड किल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. रायगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या समुद्रातील किल्यांसह विकास करा, सर्व सरकार करू शकत नाही. फोर्ट फाऊंडेशन स्थापन केले आहे. तुम्ही सर्वांनी तेथे सहभाग घ्यावा. किल्ले संवर्धन मोहिमेचे घटक व्हावे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.

बांधकाम व्यवसायात कला आणि संस्कृती आहे. ही कल्पना छोट्या तालुक्यात राबवू शकतो. म्हणजे तेथील तरुण नोकरीसाठी बाहेर जाणार नाही.

व्यवसाय करताना कला, संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने काम केले पाहिजे.

संभाजी महाराज म्हणाले, मराठी किंबहुना भूमिपुत्र व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्व एकत्र आले आहेत.
तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. त्याला ताकद कशी देता येईल,
गरीब मराठी समाजाला असुरक्षित वातावरणातून कसे बाहेर काढता येईल, छोट्या शहरातील मुलांना कशी मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे.महाराष्ट्रासाठी मराठी बांधकाम व्यावसायिकांच्या महासंघाची स्थापना आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संभाजीराजे बोलत होते. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सतिश मगर, महासंघाचे नवर्निवाचित चेअरमन डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. अजित मराठे, गजेंद्र पवार, सचिव प्रकाश बाविस्कर, सहसचिव संदीप कोलटकर, खजिनदार बाबासाहेब भोसले, सहखजिनदार प्रमोद पाटील, नंदकुमार घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्यांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध करून देणे, व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणे, सरकार दरबारी संघटनेचे प्रश्न मांडणे, व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन करणे ही मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या स्थापनेमागील भूमिका असल्याची माहिती हावरे यांनी आपल्या भाषणात दिली.

सतीश मगर म्हणाले, कोणाच्या दावणीला बांधू नका. महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी काम करा. भूमिपुत्रांनी उद्दिष्ट पूर्ण करा. व्यवसायात राजकारण आणू नका.

मराठी माणूस एकटा पडू नये, त्याच्या मागे संघटनेचे पाठबळ असावे, तो संघटित असावा, तो रोजगार देणारा असावा, त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे, व्यवसाय टिकला पाहिजे, नवीन व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने राज्यासाठी महासंघ कार्यरत राहणार असल्याची माहिती एस. आर. कुलकर्णी यांनी दिली.

टाउनशिप आणि नॅनो हाउसिंग या विषयांवर सतीश मगर आणि सुरेश हावरे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. राजेंद्र आवटे आणि मिलिंद देशपांडे यांनी मुलाखत घेतली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.