मुंबई : एमएमआरडीएमधील पदांच्या नेमणुका झालेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारने तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री अजित पवार यांना आज दिले.
एमएमआरडीएमधील ९ सप्टेंबर २०१९ रोजीची प्रसिद्ध केलेली जाहिरात आणि निवड यादीतील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या नेमणुका होऊन डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसुध्दा झाले .सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षण रद्द करण्याच्या अगोदर ही प्रक्रिया झाली होती. जाहिरात प्रसिद्धी आणि निवड यादी मार्च १९ पूर्वी झालेली आहे. मात्र त्यांना राज्य सरकारने नियुक्त्या दिलेल्या नाहीत. निकालाच्या अगोदर जर जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मुलांना वेठीस धरणे योग्य नाही. सरकारने या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, असे आमदार शिरोळे यांनी उपमुख्य मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मा उप मुख्यमंत्र्यांनी , ऍडवोकेट जनरल यांचा अभिप्राय घेऊन सदर विषयावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

