पुणे –
पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रीतीश देशमुख यांच्या घरझडतीमध्ये सायबर पोलिसांच्या हाती 2020 मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे लागली होती. दरम्यान, टीईटी परीक्षेशी निगडित असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची पोलिसांनी चौकशी केली होती.
प्रत्येक विद्यार्थ्याकडून घ्यायचे 50 हजार ते एक लाख!
राज्य सरकारच्या परीक्षा पेपरफुटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. तुकारामकडून कोट्यधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या घोटाळ्यात कुणाला किती कोटी मिळाले याची माहिती सुद्धा पोलिसांनी जारी केली.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे.
4 कोटी 20 लाख रुपयांचा घोटाळा
पोलिसांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, तुकाराम सुपेकडूनच 5 तोळे दागिने आणि 5.5 लाखांची एफडी असलेली कागदपत्रे सुद्धा सापडली.
प्रत्येकाचा वाटा ठरलेला, कुणाला किती कोटी?
उल्लेखनीय बाब म्हणजे, जवळपास सव्वा चार कोटींच्या गैरव्यवहारात प्रत्येकाचा वाटा देखील ठरलेला होता. त्यानुसारच तुकाराम सुपेला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये मिळणार अशी डील झाली होती. तर यातील दुसरा एक आरोपी प्रितीश देशमुखला 1 कोटी 25 लाख रुपये आणि अभिषेक सावरीकरला सुद्धा 1.25 कोटी रुपये मिळतील अशी डील झाली होती. यापैकीच 80 लाखांचा रोकड सुपेकडून जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे इयत्ता 5 वी आणि 8 वी शिक्षवृत्ती परीक्षा, शिक्षक पात्रतपा परीक्षा, टायपिंग व शॉर्ट हँड परीक्षा, ईसीबी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्याअंतर्गत सेवा परीक्षा, डि. एल. ई. डी इ. परीक्षांचे आयोजन खासगी कंत्राटी कंपन्यांमार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यासाठी 2019 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातूनुसार 19 जानेवारी 2020 रोजी ही पात्रता परिक्षा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस कंत्राट दिले होते.
या कंपनीचा महाराष्ट्रातील संचाकल प्रितीश देशमुख याच्यावर ही सर्व जबाबदारी होती. याचाच फायदा घेत त्याने तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांना विश्वास घेतले आणि वेगवेगळ्या एजंटांना मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना पात्र करुन देण्याच्या बदल्या पैसे वसूल केले. नंतर परीक्षा निकालाच्या प्रक्रिये दरम्यान फेरफार करुन त्यांना पात्र करण्यात आले.

