पुण्याच्या पालकमंत्री पदावरून :केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ म्हणाले …

Date:

पुणे -पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी महायुतीत कोणताही वाद नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत काेणताही वाद नाही. आम्ही निवडणुक एकत्रित लढलाे असून महायुतीच्या नेत्यात चांगल्याप्रकारे समन्वय आहे. कार्यकर्त्यांत समज देखील आहे. त्यामुळे ते पक्ष नेतृत्व जाे निर्णय घेताे त्याची अंमलबजावणी करतात. पक्ष नेतृत्व जे सांगताे ते ऐकणे ही आमच्या पक्षात शिस्त आहे. मनपा निवडणुकीच्या जागांबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या वाटेवर जात अाहे. जगात देखील देशाची पत वाढली आहे. माेदी यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक नेते भाजपात येत आहेत. पुण्यात देखील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात येत आहेत. आम्ही काेणाला त्रास देत नाही किंवा या म्हणून सांगत नाही, आमचे चांगले काम सुरु असल्याने लाेक साेबत येत आहेत. जागा लढणे व जागा जिंकणे यात फरक असताे, असे मुरलीधर माेहाेळ म्हणाले.पुण्यातील भिडेवाडा येथे फुले दाम्पत्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, फुले दाम्पत्याचे नाव देशभर प्रवास करताना सर्वत्र घेत असल्याचे जाणवते. सातत्याने आम्ही महापुरुषांना पूजन करण्यासाठी तसेच कर्तृत्वाची जाणीव ठेवण्याकरिता येत असताे. अनेक सामाजिक बांधलिकी उपक्रम देखील आम्ही करताे.माेहाेळ म्हणाले, देशातून दरवर्षी सव्वादाेन काेटी भाविक शिर्डीला येतात. परंतु त्याठिकाणी विमानसेवा २४ तास तिथे सुरु नाही. नाईट लँडिंगचे काही प्रश्न हाेते, सीआयएसएफ, एटीसी मनुष्यबळचा विषय हाेता, त्यामुळे त्याबाबत मी बैठक घेऊन दाेन ते तीन महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील शिर्डी विमानतळासाठी पाठपुरावा हाेता. तीन महिन्यानंतर शिर्डीचे विमानतळ २४ तास सुरु राहिल असे नियाेजन करण्यात आले आहे. पुरंदर विमानतळबाबत जागा निश्चित झाली आहे. रविवारी राज्यातील सर्व विमानतळ संर्दभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साेबत मुंबईत बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील बैठक मुंबईत हाेणार असून त्यात पुण्यातील पुरंदर विमानतळाचा प्रश्न असणार आहे.मुंब्र्यात मराठी अस्मितेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत माेहाेळ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, अशाप्रकारे काेणता प्रकार राज्यात चालू देणार नाही. संबंधितांवर कारवाई देखील झाली आहे. मागीलवेळी देखील असाच एक प्रकार घडला हाेता. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री चांगल्याप्रकारे प्रश्न हाताळत आहे. राज्यात कुठेही मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का लागणार नाही ही जबाबदारी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...