Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान:तेव्हा काँग्रेस त्यांचा समर्थनासाठी पुढे आली नाही- फडणवीस

Date:

मुंबई-जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही,असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप करत पक्षाने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. कारण ते गांधी घराण्यातून नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, भारताचे महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपुर्ण देश शोक व्यक्त करत आहे. आपण सर्वजण दु:खात आहोत, मलाही दुख: वाटत आहे. त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, हे दु:खद आहे.

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) रोजी जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून 10 वर्ष देशाची धुरा सांभाळली. भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मोठे योगदान देणारे ते अर्थतज्ज्ञ होते. मनमोहन सिंग हे एक चांगले राजकारणी होते परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावाचे राजकारण संपलेले नाही.
मनमोहन सिंग गांधी घराण्यातून आलेले नसल्यामुळे काँग्रेसने त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही याआधीही अशा अनेक बड्या नेत्यांचा अपमान होताना पाहिला आहे, केवळ ते गांधी घराण्यातून नव्हते म्हणून त्यांचा अपमान होतो. आम्ही असे प्रसंग पाहिले आहे जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही.

राहुल गांधींवर आरोप करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या (मनमोहन सिंग) अपात्रतेचा अध्यादेशही राहुल गांधींनीच फाडला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचा अपमान केला असे अनेक प्रसंग आल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. केवळ मनमोहन सिंगच नाही तर दिवंगत पीव्ही नरसिंह राव, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही त्यांच्याच पक्षाच्या आणि घराण्यातील नेत्यांकडून अपमान सहन करावा लागला असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. फडणवीसांनी पुढे लिहिले की, पीव्ही नरसिंह राव यांच्या पार्थिवालाही एआयसीसी मुख्यालयात प्रवेश दिला गेला नाही. या सर्व घटनांमुळे लोकशाही आणि संविधानाचे सार जपण्यासाठी घराणेशाहीचे राजकारण किती धोकादायक आहे, याची आठवण करुन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...