राज्य चालविण्यास असक्षम मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – पुणे मराठा आंदोलन .
गेला वाल्मिकी कुणीकडे ? – मराठा आंदोलकांचा सवाल
पुणे, दि. २९ – सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हाकालपट्टी करा, बीड चा बिहार करायचा आहे का ? वाल्मिकी कराड ला शोधण्यास सरकार असक्षम आहे का ? आदी मागण्या सकल मराठा समाज अखिल नवीपेठ, सदाशिव पेठ विभागातर्फे करण्यात आल्या.
सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे नवी पेठ येथील गांजवे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
देशमुख हत्या प्रकरणात २० दिवस उलटूनही अद्याप वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली नाही. कराडला तात्काळ अटक करावी, गुन्ह्यातील दोषींना फाशी द्यावी, धनंजय मुंडे यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा, राज्यात हत्या, महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सामान्य मानसांच्या मनात भीती आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरेलेले मुख्यमंत्री , गृहमंत्री यांनी राजिनामा द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शासनाने गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्यांचा योग्य बंदोबस्त करू, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी महिलांनी दिली. तर शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली नाही, तर संपुर्ण ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी नवी पेठ परिसर दणाणून गेला होता.
यावेळी अनंत घरत, निरंजन गुंजाळ, दिनेश भिलारे, अनिकेत गायकवाड, अनिल वांजले, शेखर पवार, केदार मानकर, प्रसाद काकडे, संजय साळवी, सुर्यकांत पवार, अमित काळे, धनंजय देशमुख, निलेश निगडे, गणेश मपारी, गणेश नलावडे, सागर काकडे, प्रशांत कुरुमकर, युवराज दिसले, सचिन वडघुले, श्रीकांत मेमाणे, अतुल धर्मे, गणेश ठोंबरे, कामिनी मेमाणे, मंजुषा देशमुख, मिलन पवार, दिलिप बेंद्रे, मुकुंद ढमाले, दिलीप पोमन, किशोर जाधव, अंकुश चोरगे, मोहन दातीर, सुमित बांदल, गोरख कदम, सचिन पाचंगे, गणेश वायाल, रोहन सांडभोर, किरण शिंदे, संजय चव्हाण, सचिन भारेकर, ओंकार मालुसरे, आदित्य बालघाटे, साहिल रावडे, सोमनाथ आवळे, दिलीप गळींदे, विलास नावडकर, नारायण दिघे, मच्छिंद्र उत्तेकर, संतोष हत्ते, प्रसाद भगत, दादू ठोंबरे, दादा भिलारे, अतुल रोकडे, रवींद्र मेमाणे, अनंता भगत, दिलीप लोळगे, आदी मराठा सेवक उपस्थित होते.

