जयंत पाटील म्हणाले की, निकालानंतर राज्यात थोडं नाराजी नाट्य सुरू होते. कुणी आपल्या गावाकडे निघून गेले. या परिस्थितीला एक गाणं खूप अनुरूप आहे.
तू मइके चली जायेगी
मैं डंडा लेकर आऊंगा
मैं डंडा लेकर आऊंगा
तू डंडा लेकर आएगा
मैं कुए में गिर जाऊंगी
मैं कुए में गिर जाऊंगी
मैं रस्सी से खिंचवाऊंगा
मैं पेड़ पे चढ़ जाऊंगी
मैं ारी से कटवाऊंगा
तुम मइके चली जायेगी
मैं दूजा ब्याह रचाऊँगा
मैं दूजा ब्याह रचाऊँगा
मैं मइके नहीं जाऊंगी
मैं मइके नहीं जाऊंगी
असे काहीसे राज्यात झाले. कुणी मायके गेले नाही दुजा ब्याह रचाऊँगा म्हटलं की घाबरुन जुळणी झाली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, निकाल लागून एक महिना होत आला पण गिरीश महाजन यांना माहिती नाही की आपण कोणत्या खात्याचे मंत्री होणार. अधिवेशनाचे 6 दिवस झाले पण कोणत्या खात्याचे आपण उत्तर द्यायचे हे मंत्र्यांला माहिती नाही.
जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे मी कौतुक करतो की त्यांनी कोणत्याही चर्चांचे उत्तर देण्याचा त्रास तुम्हाला कुणाला होऊ दिला नाही. याचा दुसराही अर्थ होतो तो म्हणजे तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करायचे पाहिजे. 237 आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कोणत्याही मंत्र्यांची गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशानाचा वापर झाला आहे.

