Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

समाजाने नद्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले – विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार

Date:

‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

पुणे, प्रतिनिधी – नदीचे महत्व आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचले आहे. पुराणांमध्येदेखील नदीचे महत्व विशद केलेलं आहे. आजूबाजूला पर्यावरण क्षेत्रात एवढ्या चांगल्या संस्था आणि व्यक्ती काम करत असताना सुद्धा आपण समाज म्हणून नदीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची खंत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
लहानपणी सर्वांनी वाहत्या ओढ्यातील पाणी ओंजळीने पिलेलं आहे, मात्र आता आपण पाण्याची एवढी वाताहात लावलेली आहे की ते पाणी थेट पिण्यायोग्य राहिलेलं नाही. केवळ शासन आणि सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता नदी स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नद्यांच्या आरोग्यावरच आपले आरोग्य आणि भवितव्य अवलंबून असल्याने नद्यांचे संवर्धन करून त्यांची शाश्वतता राखणे ही काळाची गरज आहे. वनराईच्या ‘शाश्वत नद्या’ या विशेषांकामुळे नद्यांना स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याच्या कार्यमोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरील पुणे पुस्तक महोत्सवामध्ये ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, वनराईचे विश्वस्त  रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले की, दैनंदिन जीवनात रासायनिक घटक असलेले साबण, शाम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट, फिनाइल, कीटकनाशके अशा अनेक वस्तू वापरत असतो. याद्वारे नैसर्गिकरित्या विघटन न होऊ शकणारे कित्येक रासायनिक घटक घराघरांतून सांडपाण्याच्या स्वरूपात नद्यांमध्ये मिसळत असतात. त्यामुळे अशी घातक रसायनयुक्त उत्पादने नाकारून त्याऐवजी निसर्गस्नेही व पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणे गरजेचे आहे. आपण केलेल्या चुकांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा विशेषांक केवळ संग्रही न ठेवता याचे वाचन, मनन चिंतन आणि कृती केल्यास निश्चितपणे पर्यावरणाचे रक्षक होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.

सागर धारिया म्हणाले की, नदी हा आपल्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपला इतिहास, भूगोल, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा तो एक दुवा आहे. नद्यांवर फक्त धरणे बांधून आपल्याला जलसुरक्षा साधता येणार नाही, तर ‘गाँव का पानी गाँवमें, और खेत का पानी खेतमें’ हा विचार तळागाळामध्ये रुजवून दुष्काळ व पाणी टंचाईसारख्या समस्यांवर मात करता येईल. याच भूमिकेतून गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भारतामध्ये पाणलोट व्यवस्थापन तंत्राचा वापर करून ‘वनराई’ संस्था नदी संवर्धनासाठी हातभार लावत आहे. 
अमित वाडेकर म्हणाले की, नद्यांच्या शाश्वततेसाठी ‘वनराई’च्या माध्यमातून सर्व स्तरांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ हा ‘वनराई’ वार्षिक विशेषांकही याचाच एक भाग आहे. या विशेषांकातून नद्यांबाबतच्या समस्या, उपाययोजना, प्रयोग, यशकथा इत्यादींवर समग्र चर्चा घडवून आणण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेषांक वाचकांना नदी संवर्धनासाठी प्रेरित करेलच. शिवाय दिशादर्शकाचीही भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास आहे. या कार्यक्रमाचे आभार रोहिदास मोरे यांनी मानले, तर सुजाता मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...