
नागपूर -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर निवड झाल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात दाखल झाले आहेत. विविध चौकात त्यांचे स्वागत होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्या अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले. आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते.विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतीक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी दुपारी 3 वाजता नागपुरात होत आहे. यासाठी राजभवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षांतून कोण कोण मंत्री होणार याबाबत रात्री उशिरापर्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील व हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट होणार आहे. मात्र जुने इतर सर्व कॅबिनेट मंत्री कायम राहणार आहेत. तर सना नवाब मलिक, नरहरी झिरवाळ व सुनील शेळके यांना राज्यमंत्रिपदासाठी फोन गेले आहेत

मुखमंत्री झाल्यानंतर प्रथमच मी माझ्या कर्मभूमी आणि पुण्यभूमीत येतोय. त्याचा अतिशय आनंद असून साहजिकच नागपूर माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या परिवाराकडून होणारे हे स्वागत आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तार संदर्भातील सगळी नावं समोर आली आहेत. त्याअनुषंगाने आज 4 वाजता शपथविधी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे..


