Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धायरी गावातील प्रलंबित डीपी रस्त्यांचा प्रश्नांवर कार्यवाही करा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे राज्य सरकारला आदेश

Date:

महिन्यापूर्वी पत्र पण अद्यापही कार्यवाही नाहीच …

पुणे:
धायरी गावातील प्रलंबित डीपी रस्त्यांचा प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी असे आदेश राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राज्य सरकारला केले आहेत त्या संदर्भातले पत्र राष्ट्रपती सचिवालयातील अवर सचिव गौतम कुमार यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. २८ वर्षांपासून रखडलेल्या धायरी गावातील डीपी रस्त्यांना कोणी वाली उरला नाही.पालिका तसेच राज्य शासनाने धायरी गावातील डीपी रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे.अशी तक्रार करणारे पत्र आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर व नागरिकांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दिले होते. त्याची दखल घेत राष्ट्रपतींनी धायरी गावातील डीपी रस्त्यांच्या समस्येवर योग्य ती कार्यवाही करुन धनंजय बेनकर यांना माहिती द्यावी अशी सुचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. याबाबत बेनकर यांनाही राष्ट्रपतींनी पत्र दिले आहे.डीपी रस्त्यांच्या समस्येसंदर्भात पालिका प्रशासन, राज्य शासन तसेच राष्ट्रपती पंतप्रधानांना ७५ वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने , संतप्त नागरिकांनी उपोषणचा पवित्रा घेतला होता.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राज्य सरकारला लेखी पत्र दिल्याने डीपी रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकणार आहे.

बेनकर म्हणाले,’ वर्षानुवर्षे डीपी रस्ते कागदावरच आहेत .पर्यायी रस्ते नसल्यानेधायरी गावासह इतर रस्त्यावर वाहतूक कोंडीची गंभीर बनली आहे.रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेतसिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही हा रस्ता कागदावरच आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, डिपि आराखड्यातील धायरी येथीलसावित्री गार्डन ते सिंहगड रोड या
रस्त्यावर गेल्या चार पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही मध्यभागी जेमतेम चारशे मीटरचेच काम केले आहे उर्वरित काम प्रलंबित आहे.वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पोलिस, होमगार्ड, वाहतूक वार्डन नसल्याने तसेच सिग्नल बंद असल्याने
वाहतूक कोलमडली आहे.धायरी गाव रस्त्यासह धायरी- नऱ्हे,नांदेड फाट्या पासून नांदेड सिटी गेट ,लगड मळा ते धायरी फाट्या पर्यंतवाहतूक कोंडीची समस्या सर्वात गंभीर बनली आहे.

धनंजय बेनकर म्हणाले की,प्रशासनाने धायरी गावात ४ डीपी रस्त्यांचे नियोजन हे २८ वर्षांपूर्वी केले आहे. मात्र याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नाही.काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यातआले आहेत.

धनंजय बेनकर यांच्यासह धायरी गावातील ,सनी रायकर , निलेश दमिष्टे, विकास कामठे,किशोर पोकळे ,सुरेखा दमिष्टे , भाग्यश्री कामठे यशवंत लायगुडे, शिवाजी मते ,अतुल चाकणकर, भाऊसाहेब दमिष्टे,अशोक रायकर , चंद्रकांत रायकर,राजाभाऊ रायकर , निलेश पोकळे ,राजेश पोकळे, आझाद लायगुडे,चिंतामणी पोकळे , बाळासाहेब मंडलिक,शिवराज चव्हाण, माया मते,सुनीता काळे , माधुरी गायकवाड,प्रिया जाधव, प्रीती निकाळजे,ओम दमिष्टे , सुनील ठाकरेसोमनाथ भागवत, सागर जगताप,भीमराव पोकळे , प्रकाश देशपांडेवैजनाथ स्वामी, बाप्पू भिलारेवैभव कामठे, सत्यजित पवारसागर परदेशी, नागेश होमकळसआदी नागरिकांनी आझाद मैदानावर उपोषण केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय,...

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...