सोलापूर -लोकसभा, राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हांला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात. सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव आहे कुठे. त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे. ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात काही शंका निर्माण का झाली. तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा? असा सवाल मारकडवाडीमध्ये शरद पवारांचा उपस्थित करत .शरद पवार म्हणाले की, जगातील मोठा देश अमेरिका आहे. अमेरिकेत मत मतपेटीत टाकलं जातं. दुसरा मोठा देश इंग्लंड. तिथेही मत मतपेटीत टाकले जाते. यूरोप खंडातील सर्व देश आपल्या सारखे ईव्हीएमवर जात नाही. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी बदलला. जग असं आहे. तर भारतातच का. आपल्याकडे संख्या आली. लोक अस्वस्थ आहेत. आत आपणही ही निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे.
शरद पवार म्हणाले की, मारकडवाडीच्या आंदोलनामुळे EVM विरोधात देश पेटत आहे. तुम्हा सर्व ग्रामस्थाचे याबद्दल मी अभिनंदन करतो. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांना मतदानाच्या आकडेवारीवर शंका आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात बॅलेट पेपरवर मतदान होते, अनेक देशांनी EVM चा त्याग केला आहे.
शरद पवार म्हणाले की, काही निकालावर शंका व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. ह्या निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. या निवडणुकीत काही तक्रारी येतात, कुठे पराभव होतो हे होत आहे. पण संपूर्ण राज्यात याबद्दल शंका निर्माण झाली आहे. काही निकाल असे आले की जनतेच्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे.
उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून पत्र घेणार असून येत्या दोन दिवसात मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे जानकर यांनी मराठी वृत्त वाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे. तर बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, असे विनंती जानकर आयोगाला करणार आहेत. आयोगाने परवानगी दिली नाही, तर सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही जानकरांनी म्हटले आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोकं मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवाशी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर मतदान घ्या.

